"शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं"; नवाब मलिक
"शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं"; नवाब मलिक  Saam Tv
मुंबई/पुणे

"शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं"; नवाब मलिक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर मागील वर्षभरापासून केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्यांविरोधामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करत असताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावे, शेतात जाऊन काम सुरू करावे, एक नवी सुरुवात करावी, असे आवाहन मोदींनी यावेळी केले आहे.

हे देखील पहा-

त्यानंतर, देशभरामधून विविध प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी देखील मोदींच्या या निर्णयावर मत व्यक्त केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी देशात कृषी क्षेत्राकरिता दिलेल्या योगदानाची माहिती दिली आहे. त्यानंतर, केंद्र सरकारने लागू करण्यात आलेले ३ कृषी कायदे मागे घेत असल्याचे मोदींनी जाहीर केले आहे. त्यानंतर, नवाब मलिक यांनी हा शेतकऱ्यांचा आणि शेतकरी आंदोलनाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीतील या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावली होती. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेतकऱ्यांनी वर्षभरापासून आपले आंदोलन सुरूच ठेवले होते. या आंदोलनामध्ये लोकांनी प्राणाची आहुती देखील दिली आहे. शेतकरी काय मागे हटले नाहीत. शेवटी सरकारला कायदा रद्द करावा लागला आहे. ७ वर्षांत मोदींनी कधीही पाय मागे घेतला नाही. आता, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुका समोर आहेत. यामुळेच, पराभवाच्या भीतीने मोदी सरकारने कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी म्हटले आहे.

Edited By- Digambar jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

RCB Vs GT : आरसीबीचा घरच्या मैदानावर मोठा विजय; गुजरातला नमवत ७ व्या क्रमांकावर झेप

KPK Jeyakumar : काँग्रेस नेत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; दोन दिवसांपासून होते बेपत्ता

SCROLL FOR NEXT