Sanjay Raut - Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut On Eknath Shinde: '२०१९ मध्ये एकनाथ शिंदेंमुळे युती तोडली', संजय राऊतांचा मोठा दावा

Sanjay Raut On Modi And Shah: शिवसेनेमुळे नाही तर मोदी-शाह यांच्यामुळे युती तुटली असल्याचे म्हणत त्यांनी युती तुटण्याचे खापर भाजपवर फोडलं आहे.

Priya More

Mumbai News: ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा युतीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी भाजपसोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. २०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यामुळे युती तुटली असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्याचसोबत शिवसेनेमुळे नाही तर मोदी-शाह यांच्यामुळे युती तुटली असल्याचे म्हणत त्यांनी युती तुटण्याचे खापर भाजपवर फोडलं आहे.

संजय राऊतांनी सांगितले की,'दिल्लीत एनडीएच्या महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये आम्ही युती तोडली नाही. शिवसेनेने तोडली असे सांगितले. त्याचे हे विधान असत्य आहे. मी आधीच सांगितलं की, २०१४ मध्ये भाजपने एका जागेवरून युती तोडली. ती युती तोडण्याची जबाबदारी पक्षाने खडसेंवर सोपवली होती. खडसेंनी याबाबत परवा स्पष्ट केलं होतं.'

'२०१४ची युती मोदी आणि शाह यांच्या सूचनेवरून तुडली. तेव्हा मोदींची हवा होती. त्यांना स्वबळावर महाराष्ट्र जिंकायचा होता. त्यामुळे २५ वर्षांची युती त्यांनी तोडून फेकून दिली. २०१९ मध्येही त्यांनीच युती तोडली. २०१९ मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते. पण भाजपने त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दिला.' असे त्यांनी सांगितले.

तसंच, 'भाजपने विचारलं मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार कोण? आम्ही शिंदे यांचं नाव घेतलं. कारण ते विधीमंडळाचे नेते होते. पण भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यास नकार दिला. युती तुटण्याचं कारण शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद होतं.', असा दावा यावेळी संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'युती करण्यासाठी अमित शाह मातोश्रीवर आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाली होती. ही चर्चा काय झाली हे वरळीतील पीसीमध्ये फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. युती, जागा वाटप आणि सत्ता वाटप यावर आमचं एकमत झालं आहे. सत्ता वाटप ५०-५० होईल असं फडणवीस म्हणाले होते.

संजय राऊतांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे नेते माधव भंडारी यांनी सामशी बोलताना सांगितले की, संजय राऊत जे बोलतात त्या प्रत्येक वाक्यावर उत्तर देण्याची आमची काहीच जबाबदारी आणि बंधनं नाहीत. गुन्हेगारी करण्याची सवयी असणारी ही व्यक्ती आहे. त्यांना सकाळी उठल्यानंतर काही तरी बोलणं आणि जमलं तर खोटं बोलणं ही त्यांची सवयी आहे.'

तसंच, 'जर एकनाथ शिंदेसाहेबांना मुख्यमंत्री करायचे होते तर महाविकास आघाडी त्यांच्या शब्दानुसार चालत होती तेव्हा त्यांना मुख्यमंत्री करायचं होतं. युती कोणी तोडली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कोणाच्या नावावर मत मागितली आणि नंतर जनतेचाच विश्वासघात केल्याहेही सर्वांना माहिती आहे.', असं देखील माधव भंडारींनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

Horoscope: करिअरमध्ये प्रगती साधाल; यश, उन्नतीचे नवीन मार्ग मिळतील

SCROLL FOR NEXT