Aaditya Thackeray saam tv
मुंबई/पुणे

'गुजरातच्या निवडणुकीसाठी राज्यातून उद्योग पळविले'; आदित्य ठाकरे यांचा भाजपवर आरोप

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Aaditya Thackeray News : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सीमावादावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. सीमावादावर प्रतिक्रिया देतना आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी राज्यातील उद्योग बाहेर जाण्यावरून भाजपवर टीका केली आहे. 'गुजरातच्या निवडणुकीसाठी राज्यातून उद्योग पळविले गेले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केला. (Latest Marathi News)

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील चारकोप भागात शिवसेनेच्या वतीने मालवणी जत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी या मालवणी जत्रोस्तवाला भेट दिली

यावेळी भाजपवर टीका करताना आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, 'सीमावादावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. गुजरातच्या निवडणुकीसाठी राज्यातून उद्योग पळविले गेले. तसंच आता कर्नाटकाची निवडणूक लागणार आहे. तिथे आता सध्याच्या सरकारची परिस्थिती स्थिर नसल्याने त्यांना आता गावे आणि जिल्हे पळवायचे आहेत'.

शिंदे गटावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात त्यांनी ज्या गद्दारांना पाठिंबा दिला आहे. त्याच्यातूनच आपल्याला कळतंय की, राज्यातून उद्योग निघून चालले आहेत. महाराष्ट्रात कृषिक्षेत्र कोलमडत आहे. कुठेही कृषिक्षेत्राला पाठबळ दिलेले नाही'.

'हे सगळं होत असताना सत्ताधाऱ्यांनी जनतेची काम करावी. गद्दार आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला. तरी कुठेही काही झालेलं नाही. महापालिकेचे निविदा रद्द होत आहेत. रस्त्याचे कामे कुठेही होत नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

राज्यपालांवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, 'अद्याप महाराष्ट्रद्वेषी राज्यपालांना पदमुक्त केलेले नाही. त्यांच्याकडून महाराष्ट्र प्रेम का अपेक्षित करावं? खासदार उदयनराजे असो किंवा कोणीही असो आंदोलन करायची वेळ कशाला यावी. भाजप किंवा गद्दार सत्ताधाऱ्यांना राज्यापालांप्रति प्रेम आहे का?'

'हे सरकार घटानाबाह्य सरकार आहे. हे सरकार कोलमडून पडेल. हे इमान विकलेल्या लोकांचे सरकार आहे. ज्या लोकांनी स्वत:ला विकून सरकार बनवले आहे, त्यामुळे हे सरकार किती दिवस चालेल? कोणत्याही उद्योजकाला सरकारप्रति विश्वास राहिला नाही, त्यामुळे उद्योग दुसऱ्या राज्यात जात आहे,अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदची हाक

Ajit Pawar : अजितदादा विधानसभेत वापरणार मुस्लिम कार्ड !

Manoj Jarange Health Update: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, रक्तातील शुगर कमी, चालताही येईना

SCROLL FOR NEXT