uddhav thackeray and bhagat singh koshyari  saam tv
मुंबई/पुणे

केंद्राने पाठवलेल्या सॅम्पलला पुन्हा वृद्धाश्रमात पाठवा; राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंचा जोरदार घणाघात

केंद्राने पाठवलेल्या या सॅम्पलला पुन्हा बोलवून घ्या किंवा एखाद्या वृद्धाश्रमात पाठवा. सध्या कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ही कल्पनाही करता येत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली.

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray News : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण अद्याप तापलेलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. 'केंद्राने पाठवलेल्या या सॅम्पलला पुन्हा बोलवून घ्या किंवा एखाद्या वृद्धाश्रमात पाठवा. सध्या कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र ही कल्पनाही करता येत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले, 'मिंधे सरकारमुळे राज्याची सतत अवहेलना होत आहे. कोणीही यावं आणि टपली मारून जातो, असं झालं आहे'.

'महाराष्ट्राला हिंमत, धमक काहीच नाही का? कोश्यारी यांनी छत्रपत्री शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर मुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. महाराष्ट्राची अवहेलना होत आहे. केंद्रातील सरकार विविध राज्यांमध्ये राज्यपालांची नेमणूक करतं. मात्र, राज्यपालांची नियुक्ती करताना त्या माणसांची कुवत काय असते हे तपासले जात नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

'केंद्रात ज्यांच सरकार असतं त्यांची किंवा त्यांच्या विचारसरणीची लोकं राज्यपाल म्हणून नियुक्त केले जातात. मात्र आता ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही त्यांना राज्यपालपदी नियुक्त केलं जातंय का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राज्यपाल नियुक्तीचे निकषसुद्धा आता ठरवले पाहिजेत. राज्यपाल निपक्ष असायला हवेत. राज्यातील पेचप्रसंग सोडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र राज्यपाल जे बोलतात ते गांभीर्याने घेणे गरजेचं आहे. मात्र राज्यपाल काहीही बोलतील हे महाराष्ट्र मान्य करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

राज्यपालांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण?

राज्यपालांच्या सडक्या मेंदूच्या मागे कोण आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. कारण महाराष्ट्रातील आदर्शांचा अपमान करुन महाराष्ट्रातील मनातील आदर्श पुसून टाकयाचे आणि आपले नेते किंवा त्यांचे आदर्श लोकांच्या मनात बिंबवण्याची चाल याचा निषेध केलाचे पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

SCROLL FOR NEXT