रश्मी पुराणिक
Aaditya Thackeray News : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळ सुरू झाली आहे. यामुळे भाजप पक्षाने प्रचाराची जबाबदारी दिल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुजरात निवडणुकीत पक्षाचा प्रचार करत आहे. याचदरम्यान दुसरीकडे राज्य सरकारने काल होणारी मंत्रिमंडळाची बैठक देखील रद्द केली, असा आरोप शिवसेनेने केला आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. (Latest Marathi News)
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करत राज्य सरकार आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, ' महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकारने शिवसेनेचे आमदार गुजरातला पळवले. मग हक्काचे प्रकल्प गुजरातला नेऊन इथल्या तरुणांचा रोजगार पळवला'. तर 'आता तिथल्याच निवडणुकीच्या प्रचारात हे सरकार व्यस्त आहे. १ तासही यांच्याकडे नाही, काल मंत्रिमंडळाची बैठक का रद्द झाली? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून देखील आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 'पीक विमा, ओला दुष्काळ,वीज प्रश्न अश्या शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून परराज्यातल्या निवडणुकांवर खोके सरकार लक्ष केंद्रित करतंय. मंत्रिमंळ बैठक रद्द होतेय. महाराष्ट्रात हे काय चाललंय? हे सरकार नेमकं आहे कुणासाठी ?या सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी वेळ मिळणार आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला केला आहे.
राज्य सरकार सध्या औषधे व उपकरणे खरेदी करण्यासाठी महामंडळ की प्राधिकरण स्थापन करायचा याचा विचार करत आहे. यावरून देखील आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. ''महामंडळ' की 'प्राधिकरण'? अश्या गोंधळात खोके सरकार जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. औषध पुरवठ्याचा प्रश्न सोडून यांना निवडणूकांची काळजी जास्त हे दिसतंय. तुम्ही शिवसेनेशी, शिवसैनिकांशी गद्दारी केलीत,पण महाराष्ट्रासोबत गद्दारी करू नका, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.