Sanjay Raut Latest News saam tv
मुंबई/पुणे

बंडखोरांची राजकीय तिरडी उठवणारच; संजय राऊतांचा हल्लाबोल

निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना ८ ऑगस्ट रोजी शिवसेना खरी कोणाची यावर लेखी पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना ८ ऑगस्ट रोजी शिवसेना खरी कोणाची यावर लेखी पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावर शिवसेनेचे नेत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना (ShivSena) आमची आहे त्यासाठी पुरावा तुम्हाला काय पाहिजे, सिमा प्रश्नासाठी मेलेले आमचे ६९ आमचे हुतात्मे हा पुरावा आहे. हजारो आंदोलनातून आमची लोक मारली गेलीत हा पुरावा आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, अस वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. १०-२० लोक पैसे देऊन फोडले हा पुरावा होऊ शकत नाही, असा टोलाही राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे, आणि त्या शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाही. राज्यात बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने शिवसेना पुढे निघाली आहे. लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले होते, त्याचे उत्तर त्यांनी दिले नाही. आणि बंडखोरांनी दिलेल्या पत्रावर एका दिवसात निर्णय घेतला, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेने राज्यात अन्यायाच्या विरोधात काम केले आहे. राज्यातील जनता तुम्हाला उत्तर देणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले. फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले, हे सरकार कोणाचे आहे त्यामुळे आता असा निर्णय घेणार ते. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार अस्तित्वातच नाही, एक महिना झाला तरी सरकारचे अस्तित्व दिसत नाही. दोघांचं मंत्रिमंडळ आहे. अजूनही चाचपडत आहेत सरकार बनवण्यासाठी आणि निर्णय घेतात मोठ मोठे जे निर्णय बेकायदेशीर आणि असविधानिक आहेत, असंही राऊत म्हणाले.

निवडणूक आयोगाने दिले दोन्ही गटांना दिले आदेश

शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. भाजपसोबत जात शिंदे गटाने सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण शिवसेनेने शिंदे गटावर कारवाई करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. आता शिवसेना कोणाची या संदर्भात ८ ऑगस्ट रोजी निवडणूक (Election) आयोगाने पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शिंदे गट आणि शिवसेनेकडून ८ ऑगस्ट रोजी १ वाजेपर्यंत लेखी पुरावे देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता मुळ शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे राहणार याचा निकाल ८ ऑगस्ट रोजी समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT