Ramdas Athawale  Saam Tv
मुंबई/पुणे

...तर उद्धव ठाकरेंनी तो शब्द पाळायला हवा होता : रामदास आठवले

संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी दिलेला शब्द मोडल्याचा संभाजीराजे यांच्या आरोपावरून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. संभाजीराजे यांना काय शब्द दिला होता हे आपल्याला माहिती नाही.शब्द जर दिला असेल तर उद्धव ठाकरे यांनी तो पाळायलायला हवा होता, अशा शब्दात रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी संभाजीराजे (SambhajiRaje ) यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ramdas Athawale Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या ईशान्य मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळावा आज पवई मध्ये पार पडला. हा मेळावा संपन्न झाल्यावर आठवलेंनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपावर भाष्य केलं. रामदास आठवले म्हणाले, 'संभाजीराजे यांना काय शब्द दिला होता हे आपल्याला माहिती नाही. शब्द उद्धव ठाकरे यांनी जर दिला असेल तर त्यांनी पाळायला हवा होता. परंतु संभाजीराजेंनी भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला सोडायचा विचार करणं अत्यंत अयोग्य होतं. त्यांनी भाजपसोबत राहायला पाहिजे होतं. त्यात शिवसेनेनं त्यांना शब्द दिला होता असे त्यांचे म्हणणं आहे, दोघांमध्ये काय बोलणं झालं होतं याची आम्हाला कल्पना नाही. मात्र, संभाजीराजेंनी भाजपपासून दूर जायला नको होतं.'

दरम्यान, आठवले यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील त्यांच्या पक्षाची रणनीती सांगितली. आठवले म्हणाले, 'रिपब्लिकन पक्षाला मुंबईमध्ये निवडणुकीला पंधरा ते वीस नगरसेवक मिळतील अशी अपेक्षा आहे. बऱ्याच वर्षापासून शिवसेना सत्तेत आहे आणि त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी आमची रणनीती आहे. गेल्यावेळी भाजप आणि आरपीआय पक्षाचे मिळून ८२ नगरसेवक आले होते. आता जवळजवळ ११५ नगरसेवक निवडून आणण्याच प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. रिपब्लिकन पक्षाला ३० ते ३२ जागा मिळाल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे. ईशान्य आणि दक्षिण मुंबईमध्ये दलितांची संख्या जास्त आहे. त्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे. त्यामुळे ३५, ३६ जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे'.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मित्र ठरले वैरी! व्यावसायिकाच्या डोक्यात झाडली गोळी; गोळीबाराच्या घटनेनं पिंपरी चिंचवड हादरलं

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

MCA Election: मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणूक; अजिंक्य नाईक गटाला 12 जागा, आशिष शेलारांना धक्का, उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड

MP Shrikant Shinde : मुंब्र्यात दहशतवादी पथकाकडून सर्च ऑपरेशन करण्याची गरज; खासदार श्रीकांत शिंदे असे का म्हणाले?

Ind vs SA 2nd Test: भारतविरुद्ध दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या कसोटीच्या वेळेत बदल, कधी सुरु होणार सामना? का होणार बदल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT