devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis : 'मी अजून अर्धच बोललोय...' पहाटेच्या शपथविधीवर फडणवीसांचं पुन्हा भाष्य

मी अजून अर्धाच बोललो आहे. उरलेलं योग्य वेळी बोलणार आहे.

Prachee kulkarni

मुंबई : अजित पवार यांच्यासोबतच्या पहाटेच्या शपथविधीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा भाष्य केलं आहे. मी बोललो ते सत्य बोललो आहे. मी अजून अर्धच बोललो आहे. योग्य वेळी सविस्तर बोलेन असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मी जे बोललो त्याचे अनेक अर्थ काढले. मी काय बोललो ते नीट ऐका त्याच्या कडी जोडता येतील. मी अजून अर्धाच बोललो आहे. उरलेलं योग्य वेळी बोलणार आहे. (Latest Marathi News)

मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून निश्चितपणे अनेक प्रयत्न झाले. माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला. पण अभिमन्यूकडून आपण अनेक गोष्टी शिकलो. चक्रव्यूह कसा तोडायचा हे आता माहित झालं आहे, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजित पवारांसोबत झालेल्या सकाळच्या शपथविधीविषयी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली होती. त्यांच्याशी चर्चा करूनच शपतविधी झाला होता, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांणा उधाण आलं होतं.

23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु हे सरकार 72 तासांमध्येच कोसळलं होतं. त्यानंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकासआघाडी सरकार आलं. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीविषयी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आतापर्यंत स्पष्ट वक्तव्य केले नसली तरी फडणवीस यावर स्पष्टच बोललेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

90 मतदारसंघांत मतदार धोक्यात? 25 टक्के मतदारांची SIR कडे पाठ

SCROLL FOR NEXT