Sharad Pawar Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Sharad Pawar News: सत्ताधारी पक्ष जिथे कमकुवत तिथेच दंगली होतात; शरद पवारांचा गंभीर आरोप

Sharad Pawar Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे

साम टिव्ही ब्युरो

Sharad Pawar Latest News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्र हे शांतता प्रिय राज्य असूनही सातत्याने दंगली होत आहेत. जिथे सत्ताधारी पक्षाची ताकद नाही, तिथे केले जाणीवपूर्वक दंगली निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातोय, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद हाँल येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. देशात आज शेतकरी अस्वस्थ असून दुखावलेला आहे. कांदा, कापूस आणि सोयबीनसारख्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितलं होती की, आम्ही तीन वर्षात देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, पण आज ९ ते १० वर्ष होऊन गेली असं काहीच घडलं नाही. पण एका गोष्टीत डबल स्थिती बघायला मिळत आहे. ती म्हणजे शेतकरी आत्महत्या. महाराष्ट्रात गेल्या ५ महिन्यात ३९१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतात याचा अर्थ आज राज्यात काय चित्र आहे, हे मी सांगणं गरजेचं नाही, असंही शरद पवार म्हणाले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवणं ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण आज जाणीवपूर्वक समाजत जातीय दंगली घडवण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. गेल्या काही महिन्यांत कोल्हापूर, संगमनेर, नांदेड अकोला सारख्या जिल्ह्यांमध्ये जातीय दंगली झाल्या आहेत. महाराष्ट्रात शांतताप्रिय राज्य असून असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं, असं शरद पवार म्हणाले.

सत्ताधारी पक्षांची शक्ती जिथे नाही तिथे जातीय दंगली निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. राज्यात २३ जानेवारी २०२३ ते २३ मे २०२३ या कालावधीत ३ हजार १५२ मुली आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यातून महिला तसेच मुली बेपत्ता होत असतील, तर राज्यकर्ते काय करत आहेत? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

Maharashtra Live News Update : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या दरम्यान सभागृहातून शिवसेना आणि राष्ट्रवादी सदस्यांचा वॉक आऊट...

Shaktipeeth Expressway New Route: शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा; ९ गावांचा समावेश; कसा असणार मार्ग?

Shocking : "आई तू दिलेल्या जीवनाचे..." संभाजीनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT