Ajit Pawar Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar : गुजरातमध्ये निवडणुका मग महाराष्ट्रात सुट्टी का? अजित पवार शिंदे सरकारवर संतापले

गुजरात निवडणुकीत महाराष्ट्रातील गुजराती बांधवांना मतदान करता यावं यासाठी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारने पगारी सुट्टी जाहीर केली. आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar News : गुजरात निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी १ डिसेंबर तर दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. अशातच, या निवडणुकीत महाराष्ट्रातील गुजराती बांधवांना मतदान करता यावं यासाठी शिंदे-फडणवीस (Eknath Shinde)  सरकारने पगारी सुट्टी जाहीर केली. दरम्यान, या निर्णयावरून अजित पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. (Latest Marathi News)

'आम्हीही १५ वर्ष सत्तेत होते. त्यावेळी मध्यप्रदेश, गोव्यात निवडणुका झाल्या. मात्र, आम्ही कधी अशी पगारी सुट्टी दिली नाही, अशा प्रकारे नवीन पायंडा पाडणे चुकीचं आहे, असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. राज्याचा गाडा हाकताना अधिकारी सहा महिने पगारी सुट्टी घेत असेल आणि उर्वरित सहा महिने काम करत असेल, तर हा जनतेचा टॅक्स रुपाने आलेला पैशांचा गैरवापर आहे, असेही ते म्हणाले.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी शेतकरी नुकसानभरपाई, मंत्रीमंडळातील नेत्यांचे आक्षेपार्ह विधान, तसेच इतर विविध विषयांवरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं. याशिवाय गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दिलेल्या सुट्टीवरही भाष्य केलं.

काय म्हणाले अजित पवार?

'शेजारच्या राज्यात निवडणुका आहेत म्हणून आपल्या राज्यातील काही जिल्ह्यांना सुट्टी देणं योग्य नाही. निवडणुका या दर पाच वर्षांनी येतात. यापूर्वी असं कधी घडल्याचे मला आठवत नाही. आम्हीही १५ वर्ष सत्तेत होते. त्यावेळी मध्यप्रदेश, गोवा आणि कर्नाटकात निवडणुका झाल्या. मात्र, आम्ही कधी अशी पगारी सुट्टी दिली नाही, अशी प्रकारे नवीन पायंडा पाडणं चुकीचं आहे', असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गुजरात विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात १ डिसेंबर तर दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनाही मतदान करता यावे, यासाठी राज्य सरकारने राज्यातील चार जिल्ह्यांत मतदारांसाठी भर पगारी सुट्टी जाहीर केली. राज्य सरकारने १ व ५ डिसेंबर रोजी पालघर, नाशिक, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी जाहीर केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT