Jayant Patil News, Eknath Shinde News, Maharashtra Political Crisis
Jayant Patil News, Eknath Shinde News, Maharashtra Political Crisis Saam TV
मुंबई/पुणे

Jayant Patil : गुवाहाटीत गेलेले काही आमदार गुप्तहेर? जयंत पाटील काय म्हणाले? वाचा...

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार संकटात आहे. एकीकडे शिवसेनेकडून (ShivSena) या आमदारांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक मोठा खुलासा केला आहे. गुवाहाटीत दाखल झालेले शिवसेनेचे सगळेच आमदार हे बंडखोर नसून त्यातील काही आमदार हे गुप्तहेर असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. (Jayant Patil latest News)

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी काही महत्वपूर्ण खुलासे केले आहेत. त्यातील एक मोठा खुलासा म्हणजे गुवाहाटीत दाखल झालेले शिवसेनेचे सगळेच आमदार हे बंडखोर नसून त्यातील काही आमदार हे गुप्तहेर आहे. असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)

एकीकडे शिवसेनेच्या आमदारांसह खासदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात येत आहेत. तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी केलेलं हे खळबळजनक विधान शिंदे गटात फुट पाडण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पडू नये, यासाठी उद्धव ठाकरेंना राष्ट्रावादी काँग्रेस पूर्णपणे मदत करणार आहेत. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंच्या बंडाची कारणं आणि शिवसेनेच्या अंतर्गत वादाची आम्हाला माहिती नाही, असं ही त्यांनी स्पष्ट केलं. (NCP Latest News)

बंडखोरी केलेले आमदार आज ना उद्या परत येतीलच शिवसेना आमदार परतले की चित्र अधिक स्पष्ट होईल. त्यानंतरही आम्ही शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं. गेलेले आमदार परत येतील, असा विश्वास आम्हाला आजही वाटतोय. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जी साद घातली आहे, त्याला सकारात्मक प्रतिसाद सर्व आमदार देतील, अशी खात्री आम्हाला वाटतेय, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

SCROLL FOR NEXT