Ajit Pawar On Vedanta Foxconn : saam tv
मुंबई/पुणे

Vedanta : 'वेदांता'साठी 'मविआ' ने पैसे मागितले? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

'मविआ'ने वेदांतासाठी टक्केवारी मागितली होती. असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar On Vedanta Foxconn : राज्यात तब्बल साडेतीन लाख कोटींची आर्थिक गुंतवणूक आणू शकणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प शेवटच्या क्षणी गुजरातला गेला. यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हा प्रकल्प महाविकासआघाडी सरकारमुळे गुजरातला गेला, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. यावर आता विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. (Ajit Pawar News Today)

वेदांताबाबत आरोप करताना मुंबईचे भाजप अध्यक्ष यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. 'मविआ'ने वेदांतासाठी टक्केवारी मागितली होती. असा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, आशिष शेलार यांच्या या आरोपाला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले अजित पवार?

'राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले. आता काही जणांकडून आमच्यावर असा आरोप केला जात आहेत, की आम्ही काहीच केले नाही, मी तर सांगतो या प्रकरणाची चौकशी करतो, दुध का दुध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या', असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Vedanta Foxconn News Today)

वेदांता प्रकल्पावरून उगाच राज्यातील तरूण आणि नागरिकांमध्ये संभ्रम पसरण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही अजित पवारांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात हा प्रकल्प वेदांताने गुजरातला नेणार असल्याचं सांगितलं होतं, अशा अफवा पसरवल्या जात आहेत पण हे साफ चुकीचं असून मविआला बदनाम केलं जात असल्याचंही अजित पवार म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT