सध्याची वाढती वाहतूक कोंडी ही नकोशी झालीये. त्यात उन्हाचा पारा इतका वाढलाय की, प्रवास करतानाही अनेकांना उष्माघाताचा त्रास होतो. याने प्रवास वेळेवर होत नाही आणि उन्हामुळे सध्या काही गंभीर समस्यांनाही सामोरं जावं लागतं. याचाच विचार करून राज्य सरकारने एक सगळ्यांना फायदेशीर उपाय काढला आहे. त्यामध्ये मुंबईला जाण्यासाठी पुणेकरांना नवा आणि वेगवान मार्ग सुरु करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे नेरळ ते शिरूर दरम्यान १३४ किलोमीटर लांबीचा चौपदरी महामार्ग उभारण्याची मंजुरी दिली आहे. नवा मार्ग हा रायगड जिल्ह्यातल्या नेरळपासून सुरु होणार आहे. तर वांद्रे, पाईप, पाबळ आणि मलठण मार्गे थेट शिरुरपर्यंत हा मार्ग जाईल. पुणे अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील वाहनांना मुंबईकडे जाण्यासाठी हा एक नवा आणि जलद पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.
सध्या या भागातल्या बऱ्याच वाहतूक पुणे शहरातूनच मुंबईकडे जाते. त्यामुळे पुणे-शिरूर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नागरिक त्रस्त होतात. पण हा नवा महामार्ग सुरु झाल्यानंतर या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
नेरळ ते शिरूर या प्रकल्पाचा सर्वात जास्त फायदा हा पुणे आणि मुंबईदरम्यान नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहनांची संख्या कमी झाल्याने प्रवासाचा वेळ सुद्धा कमी होणार आहे. तसेच शिरूर, चाकण आणि आसपासच्या भागातील नागरिकांना मुंबई गाठण्यासाठी सोयीस्कर आणि जवळचा मार्ग मिळेल. नव्या मार्गामुळे पुण्यात प्रवेश न करता थेट मुंबईकडे जाणं शक्य होईल. त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.