Mumbai Dam Water Level Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level: पाण्याची चिंता मिटली, मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं फुल्ल

Mumbai Rain And Dam Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Priya More

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ही सातही धरणं काठोकाठ भरली आहेत. गेल्या अडीच महिन्यात झालेल्या धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे ही धरणं काठोकाठ भरली आहेत. या धरणांमध्ये सध्या ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभरासाठीचा पाणीप्रश्न मिटला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये आता ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

मुंबई महानगर पालिकेने गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९८ टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १४,२५,१२८ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण ९८.४६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये १४,०४,८०४ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच मागच्यावर्षी ९७.०६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा १ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे.

मुंबई शहर आणि उपनगराला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलावांचा समावेश आहे. या सातही धरण आणि तलाव क्षेत्रात गेल्या दोन ते दीड महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला. सध्या धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. या धरणातील पाणीसाठा ९८ टक्क्यांवर पोहचला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीपुरववठा केला जातो. या धरणांमधील पाणीसाठा वाढल्यामुळे मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठा -

- अप्पर वैतरणा - ९९.१५ टक्के पाणीसाठा

- मोडक सागर - ९९.५७ टक्के पाणीसाठा.

- तानसा - ९८.३७ टक्के पाणीसाठा.

- मध्य वैतरणा - ९७.५४ टक्के पाणीसाठा

- भातसा - ९७.८६ टक्के पाणीसाठा.

- विहार - १०० टक्के पाणीसाठा.

- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Student Death : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, अज्ञातांनी छातीत गोळ्या घालून संपवलं

Maharashtra Live News Update : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा संगीत सूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

आदिवासींकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक, अनेक पत्रकार, पोलीस जखमी; नेमकं काय घडलं? VIDEO

IND vs AUS: विराट-रोहितचा युग संपला, २०२७ चा वर्ल्डकप खेळणार नाही? कुणी दिले संकेत

Chhagan Bhujbal: ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मंत्री छगन भुजबळ आक्रमक|VIDEO

SCROLL FOR NEXT