Malegaon Bomb Blast Saam TV
मुंबई/पुणे

Malegaon Bomb Blast: मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका

Malegaon Blast Verdict: मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. १७ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल कोर्टाने जाहीर केला आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली.

Priya More

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल समोर आला आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपींची कोर्टाने निर्दोष सुटका केली. तब्बल १७ वर्षानंतर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली. एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सर्व आरोपी निर्दोष असल्याचे सांगितले. या प्रकरणात भोपाळच्या भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सातही आरोपींची १७ वर्षांनंतर कोर्टाने निर्दोष सुटका केली.

एनआयएच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल जाहीर करताना सांगितले की, 'संशयाच्या आधारे आरोपींना शिक्षा देऊ शकत नाही. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या मालकीची दुचाकी होती हे तपासातून सिद्ध झालं नाही. दुचाकीचा चॅसी नंबरही रिकव्हर झाला नाही. ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे देखील सिद्ध करता आले नाही. या प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी आहे. पंचनामा योग्य झाला नव्हता. जागेवरून हाताचे ठसे जप्त करण्यात आले नव्हते.'

न्यायालयाने पुढे असे देखील सांगितले की, 'मालेगावमध्ये स्फोट झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केले. पण दुचाकीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करण्यात ते अपयशी ठरले. एटीएस आणि एनआयएच्या आरोपांमध्ये खूप फरक आहे. प्रसाद पुरोहितांनी बॉम्ब बनवला आणि पुरवल्याचा कोणताही पुरावा नाही. प्रत्यक्षदर्शिंनी देखील त्यांचे जबाब बदलले होते.'

मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना संशयाचा फायदा झाला. या प्रकरणात भाजपच्या नेत्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या सातही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. न्यायालयाच्या निकालानंतर, या प्रकरणातील सर्व आरोपी भावुक झाले. 'आमचा १७ वर्षांनंतर पुनर्जन्म झाला.', असे म्हणत या प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी भावुक झाले.

दरम्यान, मालेगावमधील भिक्खू चौकातील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ ला हा बॉम्बस्फोट झाला होता. रात्री ९.३५ वाजता हा बॉम्बस्फोट करण्यात आला होता. त्यावेळी रमजानचा महिना सुरू होता. मशिदीजवळच्या एका मोटरसायकवर ठेवलेल्या स्फोटकांद्वारे हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. यामध्ये ६ निष्पाप मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर १०१ जण जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT