Ladki Bahin yojana  Saam tv
मुंबई/पुणे

Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर, VIDEO

Ladki Bahin yojana News : लाडकी बहीण योजनेविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या २१०० रुपयांच्या हप्त्याविषयी देखील मंत्री तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Vishal Gangurde

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांना मिळणार

महायुती सरकारकडून २१०० हप्त्याचं आश्वासन योग्य वेळी पूर्ण केलं जाईल

मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ही योजना खंडित होणार नाही

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साम टीव्ही कार्यालयात बाप्पाचं दर्शन घेऊन मंत्री तटकरे यांनी अपडेट

लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यातील लाडक्या बहिणी सध्या ऑगस्टच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. दुसरीकडे महायुतीने निवडणूक काळात लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता देण्याचं आश्वासन दिलं होतं. महायुतीने दिलेलं आश्वासन योग्यवेळी पूर्ण करणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मंत्री आदिती तटकरे यांनी साम टीव्ही मराठीच्या कार्यालयातील विराजमान असलेल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेतलं. त्यानंतर साम टीव्ही प्रतिनिधींशी बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेविषयी महत्वाची अपडेट दिली. मंत्री तटकरे गणेशोत्सवाविषयी म्हणाल्या की, 'बाप्पाच्या आगमनाचा वेगळा उत्साह असतो. जगभरात खरंतर अतिशय आनंदात साजरा केला जातो. यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सव घोषित केलं आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज आहे. आज सामच्या कार्यालयात गणरायाचं दर्शन घेतल्याने आनंद झाला. आपण बाप्पाची सेवा करत असतो'.

ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार?

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडक्या बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकरच पात्र महिलांना मिळेल. लाडकी बहीण योजना अशीच सुरु ठेवण्याचा संकल्प आहे. यशस्वीरित्या ही योजना चालू ठेवण्याचं महायुतीचा संकल्प आहे. तो कुठेही खंडीत होण्याचं नाही. लाडक्या बहिणीचा लाभ नित्यनियमाने राहील'. महायुतीने २१०० रुपयांच्या हप्त्याविषयी तटकरे म्हणाल्या की, 'महायुतीचा जाहीरनामा हा ५ वर्षांच्या कालावधीचा आहे. त्यात महायुतीकडून लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. हे आश्वासन योग्यवेळी पूर्ण करणार आहे. योग्यवेळी २१०० रुपयांचा लाभ पोहोचवला जाईल'.

लाडकी बहीण योजनेच्या सरकारवर पडणाऱ्या भाराविषयी तटकरेंनी भाष्य केलं. ' कोणतीही योजना सुरु करण्याआधी त्याचा आढावा घेतला जातो. या योजनेच्या बाबीचाही विचार करण्यात आला होता. सगळ्या बाबी निश्चित करून ही योजना आणली गेली. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबत विचार केला होता. योजनेचा विचार करून चालत नाही. तर यशस्वीरित्या चालवणे अगदी गरजेचं आहे. ती योजना पुढे चालू ठेवण्यासाठी योजना सरकारने केली आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

SCROLL FOR NEXT