Maharashtra Politics Shiv Sena Uddhav Thackeray party questions to Election Commission  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: निवडणूक प्रचारात धर्माच्या नावाने मतं मागायची का? ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल

Satish Daud

Uddhav Thackeray Questions to Election Commission

धर्माच्या नावाने मते मागितल्यास निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग होत नाही का? असं करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी आहे का? असा सवाल उपस्थित करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहलं आहे.

याविषयी निवडणूक आयोगाने एकदाचे स्पष्टीकरण द्यावे आणि भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी देखील या पत्रात करण्यात आली आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी हे पत्र लिहलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकत्याच ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजप नेत्यांनी उघडपणे धर्माच्या नावाने प्रचार केलाचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १६ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहत जाब विचारला होता.

आचारसंहितेचे नियम शिथील केले आहेत का? तसा काही बदल केला असेल तर त्याबाबत निवडणूक आयोगाने देशातील सर्व पक्षांना आणि मतदारांनाही अवगत करावे, अशी मागणीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या पत्रात केली होती. यावर निवडणूक आयोगाकडून कोणतंही उत्तर आलं नाही.

त्यामुळे ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला स्मरणपत्र लिहत विचारणा केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या पत्रावर निवडणूक आयोग काय उत्तर देणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, यावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

पत्रात नेमके काय?

निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून धार्मिक आधारावर उघडपणे केली जाणारी आवाहने तसेच धर्माच्या नावावर मागितली जाणारी मते यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होते की नाही याविषयी निवडणूक आयोगाने एकदाचे स्पष्टीकरण द्यावे आणि भूमिका स्पष्ट करावी, असं ठाकरे गटाकडून विचारण्यात आलं आहे.

आधीच्या पत्रावर आयोगाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मग, निवडणूक प्रचारात धर्माच्या आणि देव-देवतांच्या नावावर मतदारांना आवाहन करत मते मागण्याची सरसकट परवानगी आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना दिली आहे, असे आम्ही गृहित धरायचे का, अशी विचारणाही ठाकरे गटाने केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT