MNS/Shivsena Saam TV
मुंबई/पुणे

"विचारांबरोबर धर्मही बदललात का? कायदा राबवायचा असेल तर भोंग्याबद्दल राबवा"

एवढाच कायदा राबवायचा असेल तर तो मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब ….! 

प्रदीप भणगे

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाण्यामध्ये उत्तर सभा घेतली होती. गुढीपाडव्याच्या शिवाजीपार्कवरील सभेनंतर राज यांच्यावर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी ही सभा मनसेकडून (MNS) घेण्यात आली होती.

याच ठाण्यातील उत्तरसभे दरम्यान राज ठाकरेंना मनसे नेत्यांनी तलवार भेट म्हणून दिली यावेळी त्यांनी ती तलवार सभेला दाखवल्याने नौपाडा पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसंच मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) शहर अध्यक्ष रवी मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा दाखल केल्यामुळे आता मनसे नेते आक्रमक झाले असून मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी या प्रकरणावरुन शिवसेनेवर टीका केली आहे. विचारांबरोबर धर्म पण बदललात काय ? एवढाच कायदा राबवायचा असेल तर तो मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब असा सवाल त्यांनी आपल्या ट्विटद्वारे शिवसेना केला आहे.

राजू पाटील आपल्या ट्विटमध्ये लिहितात, शिवरायांचे प्रतिक म्हणून दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढून दाखवली तर एवढी तौबा तौबा करायची काय गरज आहे ? विचारांबरोबर धर्म पण बदललात काय ? आणि एवढाच कायदा राबवायचा असेल तर तो मराठी पाट्या व भोंग्याबद्दल राबवा की जनाब ….! असं म्हणत हे ट्विट त्यांनी उद्धव ठाकरेंना टॅग केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

SCROLL FOR NEXT