bhagat singh koshyari and sudhanshu trivedi  saam tv
मुंबई/पुणे

राज्यपाल भगत सिंह कोशयारी आणि खासदार सुधांशू त्रिवेदींना वादग्रस्त वक्तव्य भोवणार? मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल

महाराष्ट्राचे राज्यापाल भगत सिंह कोशयारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदींविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

Maharashtra Political News : महाराष्ट्राचे राज्यापाल भगत सिंह कोशयारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदींविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदींना वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Latest Marathi News)

राज्यापाल भगत सिंह कोशयारी (Bhagat Singh Koshyari) आणि भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांच्या विरोधात महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले आणि मराठी माणसाचा अवमान केल्याप्रकरणी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, जनजाती प्रतिबंधक अधिनियम 2015 (सुधारित) कलम 3 (1)(v) नुसार ही याचिका दाखल करण्यात आली आहे

राज्यपाल कोश्यारी आणि खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे अनुसूचित जातींसोबतच सर्वसामान्य लोकांचीही भावना दुखावल्याचा याचिकेतून आरोप करण्यात आला आहे. लवकरच या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्ता रमा अरविंद यांच्या वतीनं वकील अमित कटारनवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates: नांदेडमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या मतदान केंद्रावर रांगा

​​Nashik Ring Road: विकासाकडे नेणारा रिंगरोड; नाशिक ते तिरुपतीचा १३०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण होणार १२ तासात

Central Railway : मुंबई ते सावंतवाडी रोड, चिपळूण विशेष रेल्वेगाडी चालविण्याची कोकणवासियांची मागणी, कारण काय? वाचा

Saam TV exit poll: वसई-विरारमध्ये बहुजन विकास पक्ष सत्ता राखणार? भाजपचे प्रयत्न अपुरे ठरण्याची शक्यता

Saam Tv Exit Poll: कल्याण-डोंबिवलीत शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष, भाजपला किती जागा मिळणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT