काँग्रेसच्या वतीने भिंत दुर्घटना पीडितांना मदत
काँग्रेसच्या वतीने भिंत दुर्घटना पीडितांना मदत जयश्री मोरे
मुंबई/पुणे

काँग्रेसच्या वतीने भिंत दुर्घटना पीडितांना मदत

जयश्री मोरे

मुंबई - 18 जुलैला पडलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूरच्या भारतनगर परिसरात 8 घरांवर भिंत कोसळली होती. यात 19 जणांचे प्राण गेले तर पाच जण जखमी झाले होते. यानंतर पालिका प्रशासनाने पीडित कुटुंबियांना विष्णूनगर येथे असलेल्या पालिकेच्या इमारातींमध्ये स्थलांतरित केले.

तसेच इतर या घटनेत बाधित इतर परिवारांना देखील याठिकाणी हलवण्यात आले आहे. सध्या पालिकेने त्या इमारतीमध्ये एकूण 37 कुटुंबाना स्थलांतरित केले आहे. झालेल्या भिंत दुर्घटनेत या पीडित कुटुंबियांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. घरातील साहित्य वगैरे सर्व काही यात नष्ट झाले.

महापालिकेने राहण्याची व्यवस्था केलेल्या इमारतीमध्ये हे पीडित कुटुंबीय या ठिकाणी फक्त अंगावरच्या कपड्यांसह किंवा अगदी थोडेसे सामान घेऊन या ठिकाणी राहायला आले आहेत. या गोष्टीच्या अनुषंगाने या घटनेत मृतक झालेल्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना काँग्रेस पक्षाच्या वतीने 25 हजार रुपयांची आर्थिक मदत आणि जखमींना 15 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. तसेच धान्य व राशनची देखील मदत करण्यात आली आहे.

केंद्र आणि राज्य शासनाने या कुटुंबियांना 7 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. परंतु ती अजून पोहचली नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात काँग्रेसकडून करण्यात आलेली मदत हि या कुटुंबियांसाठी मोलाची आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

Maharashtra Politics: लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, साताऱ्यात शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल

Jake Fraser-McGurk : जेक फ्रेझर-मॅकगर्कचा विक्रम थोडक्यात हुकला

Kolhapur News: लहानग्याने केला हट्ट, वाढदिवस साजरा करण्यासाठी थेट मुख्यमंत्रीच पोहोचले

SCROLL FOR NEXT