भिवंडीत पतीसह दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्याच्या दुचाकीला अवजड वाहनाने जोराची धडक दिली. यात दुचाकीच्या मागे बसलेली जागीच ठार झाली आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर दुपारी ही घटना घडली. शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही अवजड ट्रक रस्त्यावर कसे धावतात? असा प्रश्न नागरिकांनी केला असून या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे.
तेहसीन शहाबाज अंसारी (वय अंदाजे २५ ) असं महिलेचं नाव आहे. मृत महिला आपल्या पतीसह महापोली गावातील एका शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. मागील वर्षभरापूर्वीच तिचा विवाह झाला होता. आज ही महिला पती शहाबाज अंसारी यांच्यासह दुचाकीवरून जात होती. दरम्यान वंजारपट्टी नाका येथील डॉ.एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर आली असता अवजड ट्रकने धडक दिली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातात पती शहाबाज वाचला असून त्याला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहरात होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र बंदी असतानाही भर दुपारी अवजड वाहने उड्डाणपूलांवरून सोडली जात आहेत. त्यामुळेच आज महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूला अवजड वाहने व वाहतूक पोलिसांचा दुर्लक्षित कारभार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया शहरातील दक्ष नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.