शहापूर भातसा धरण ओव्हर फ्लो; मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली
शहापूर भातसा धरण ओव्हर फ्लो; मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली फय्याज शेख
मुंबई/पुणे

शहापूर भातसा धरण ओव्हर फ्लो; मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शहापूर : शहापूर तालुक्यातील मुंबईला (Mumbai) सर्वाधिक पाणी पुरवठा करणारे भातसा धरण (Bhatsa Dam) आज भरून वाहू लागले आहे. यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. तालुक्यातील सर्वच धरणे भरून वाहू लागली असताना गेल्या चार दिवसापासून सतत पडत असलेल्या संततधार तर कधी जोरदार पावसामुळे (Heavy Rain) आज धरणाची पाणी पातळी 141.01 इतकी पाणी पातळी वाढल्याने शासकीय नियमानुसार धरण ओव्हरफ्लो करण्यात आले तर धरण भरल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.(Bhatsa dam overflow)

हे देखील पहा-

पाण्याचा वेग व नदीची पूजा व नदीत पाणी कमी झाल्याच्या कारणांनी तीन वेळा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र आज 3 वाजून 20 मिनिटांनी शासकीय नियमानुसार धरण ओव्हरफ्लो (Overflow) करण्यात आले आहे. पहिल्या व पाचव्या अशा दोन दरवाज्यातून 25 सेंटिमीटर ने दरवाजे वर उचलण्यात येवून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी सांगितले.

नदी लगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून. पाण्याची पातळी आणखी वाढल्यास आणखी दरवाजे उघडुन अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला अपघात, चौघांचा मृत्यू

ICC Test Ranking: टी -२० वर्ल्डकपआधी टीम इंडियाला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियाने मागे सोडत गाठलं नंबर १ स्थान

Today's Marathi News Live : शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या वाहनाचा अपघात, ४ जण ठार

Viral Video: जावई पडला सासूच्या प्रेमात, सासऱ्याने असं काही केलं की संपूर्ण गाव करतंय कौतुक

Narendra Patil : मराठी माणसांवर हल्ले करणाऱ्या काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी जवळ केले, हे दुर्भाग्य : नरेंद्र पाटील

SCROLL FOR NEXT