Mumbai Bus Fare Hike Saam Tv
मुंबई/पुणे

BEST Bus Ticket: बेस्टचा प्रवास महागणार, एसी आणि नॉन एसी बसचे तिकीट दुप्पट वाढणार, नेमकं कारण काय?

Mumbai Bus Fare Hike: बेस्ट मुंबईत एसी आणि नॉन-एसी बसेसचे भाडे वाढवण्याचा विचार करत आहे. सरकारच्या मंजुरीनंतरच हा प्रस्ताव लागू केला जाईल. जर भाडेवाढ झाली तर प्रवासासाठी प्रवाशांना दुप्पट पैसे मोजावे लागतील.

Priya More

बेस्टच्या बसने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आता बेस्टचा प्रवास महागणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजे बेस्ट मुंबईत एसी आणि नॉन-एसी बसेसचे भाडे वाढवण्याचा विचार करत आहे. सरकारच्या मंजुरीनंतरच हा प्रस्ताव लागू केला जाईल. पण सध्या बेस्टच्या भाडेवाढीवर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्टचे नवे महाव्यवस्थापक एस.व्ही.आर. अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या श्रीनिवास यांनी गेल्या आठवड्यात सर्व बस सेवा आणि भाडेवाढीच्या मुद्द्यासह प्रलंबित मागण्यांचा आढावा घेतला. भविष्यात बेस्टसाठी शाश्वत महसूल मॉडेल म्हणून गरज पडल्यास भाडेवाढीचा विचार आम्ही करू, असे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

बेस्ट परिवहन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्य बेस्ट बसेससाठी किमान भाडे १० रुपये आणि एसी बसेससाठी १२ रुपयांनी वाढवण्याचा प्रस्ताव आहे. सध्या, ५ किमी प्रवासासाठी सामान्य बससाठी किमान भाडे ५ रुपये आणि एसी बससाठी ६ रुपये भाडे आकारले जात आहे. आता जर बेस्टने भाडेवाढ केली तर प्रवाशांना दुप्पट पैसे मोजावे लागतील.

२०१२-१३ पासून आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या बेस्टला आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेकडून ११,३०४ कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वीच बीएमसीने बेस्टला चार शिफारसी दिल्या. ज्यात किमान बसभाडे ५ वरून १० रुपयांपर्यंत वाढवणे, त्यांच्या संसाधनांचा/मालमत्तेचा व्यावसायिक वापर करणे, जागतिक बँकेकडून आर्थिक मदत मिळवणे आणि केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान मिळवणे यांचा समावेश आहे.

पण सध्या बेस्टच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला विरोध केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट केले होते की, बसेसची संख्या आधीच कमी करण्यात आली आहे. बस थांबे जाहिरात फलकांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहेत. मग भाडेवाढ का? आम्ही बेस्टचे भाडे जगातील सर्वात परवडणारे ठेवले आणि तरीही आमचा ताफा १०,००० इलेक्ट्रिक बसेसपर्यंत वाढवण्याची योजना आखली.

वाहतूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बेस्ट शहरात २५० एसी आणि २५० नॉन-एसी अशा ५०० नवीन बसेस आणत नाही तोपर्यंत भाडे वाढवण्याची गरज नाही. सध्या, बेस्टच्या बसगाड्यांची संख्या २,९०० पेक्षा कमी झाली आहे जी गेल्या दशकातील सर्वात कमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार? या दिवशी येऊ शकतात ₹२०००

Ajit Pawar Death: विमानात अजितदादांसोबत भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती? खासदाराच्या शंकेने राजकारणात खळबळ

Crime News : नवऱ्याने मोबाईल घेऊन द्यायला नकार दिला, महिलेने मुलासह विहिरीत उडी मारली अन्...

Maharashtra Live News Update: रत्नागिरी जिल्हा परिषदेवर भगवा फडकेल - उदय सामंत

Accident : कारची दुचाकीला जोरात धडक, एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा जागेवरच मृत्यू, शिवसेनेवर शोककळा

SCROLL FOR NEXT