weather Alert Heavy Rain of Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : छत्री-रेनकोट घेऊनच बाहेर पडा, महाराष्ट्रात आज अतिमुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार

Rain News Today in Maharashtra : आयएमडीच्या अंदाजानुसार, आज कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. रायगड, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Satish Daud

जून महिन्यात राज्यातील काही भागात पावसाने दडी मारली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं असून बळीराजा सुखावला आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील ४८ तास राज्यात पावसाची अशी स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

शुक्रवारपासून मात्र पावसाचा जोर (Maharashtra Weather Update) ओसरण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस उघडीप घेऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, आज कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडू शकतो. रायगड, सातारा जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे दोन्ही जिल्ह्याला रेड अलर्ट (IMD Rain Alert) देण्यात आलाय. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहदनगर तसेच पुण्यासह किनारपट्टीवरील अन्य जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. पश्चिम घाटत पावसाचे प्रमाण जास्त राहू शकते. त्यामुळे पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आलंय.

आज या भागात पावसाची शक्यता

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज बुधवारी नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सिंधुदर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. रायगड आणि सातारा येथे रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस

राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्व धरणांमध्ये ३९.१७ टक्के पाणीसाठा जमा झालाय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांमध्ये ५३.१२ टक्के इतका पाणीसाठा आहे. औरंगाबाद विभागात सर्वात कमी म्हणजे १२.१३ टक्के पाणीसाठा आहे. तर नाशिक विभागात तो २८.३४ टक्के पाणीसाठा आहे. चिंताजनक बाब म्हणजे, राज्यातील १ हजार २१ गावे आणि २ हजार ५१८ वाड्यांमध्ये अजूनही एक हजार ३६५ टँकर्सद्धारे पाणीपुरवठा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT