Risod Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Risod Bajar Samiti : रिसोड बाजार समिती दहा दिवस राहणार बंद; नाणेटंचाईच्या कारणातून निर्णय

Washim News : सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस सुरू झाल्यामुळे खत, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल

वाशिम : सध्या नाणे टंचाई भासत असल्याने या कारणाने रिसोड बाजार समिती दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे एन हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. बाजार समिती बंद असल्याने भाजीपाला विक्री खासगी बाजार समितीत करावी लागत आहे. 

सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस सुरू झाल्यामुळे खत, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. पेरणीसाठी राखून ठेवलेला शेतमाल विक्रीसाठी काढला आहे. मात्र अशातच (Washim) वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी नाणे टंचाई जाणवत असल्याच्या कारणातून १३ जूनपासून २२ जूनपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मागील तीन दिवसांपासून बाजार समिती बंद आहे. 

शेतकऱ्यांची गैरसोय 

शेतकऱ्यांना (Farmer) शेतमाल विक्री करताना गैरसोय व आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. ऐन पेरणीच्या हंगामातच बाजार समिती बंद असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांना खासगी बाजारात शेतमाल विकावा लागनार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Tips: पावसात एका सेंकदात कपडे सुकवायचे असतील तर 'हे Magical Gadgets' करतील मदत

पंढरीच्या वारीची सुरूवात पहिल्यांदा कोणी केली?| Pandharpur Wari

EPFO 3.0 : PF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PF काढण्यापूर्वी 'या' गोष्टी तपासा, नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट

Raj Thackeray: "स्वतःच्या अंगाशी आलं की ते राजकारण"; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंनी सरकारला सुनावलं

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT