Risod Bajar Samiti Saam tv
महाराष्ट्र

Risod Bajar Samiti : रिसोड बाजार समिती दहा दिवस राहणार बंद; नाणेटंचाईच्या कारणातून निर्णय

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल

वाशिम : सध्या नाणे टंचाई भासत असल्याने या कारणाने रिसोड बाजार समिती दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे एन हंगामात शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. बाजार समिती बंद असल्याने भाजीपाला विक्री खासगी बाजार समितीत करावी लागत आहे. 

सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस सुरू झाल्यामुळे खत, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. पेरणीसाठी राखून ठेवलेला शेतमाल विक्रीसाठी काढला आहे. मात्र अशातच (Washim) वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनी नाणे टंचाई जाणवत असल्याच्या कारणातून १३ जूनपासून २२ जूनपर्यंत बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मागील तीन दिवसांपासून बाजार समिती बंद आहे. 

शेतकऱ्यांची गैरसोय 

शेतकऱ्यांना (Farmer) शेतमाल विक्री करताना गैरसोय व आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. ऐन पेरणीच्या हंगामातच बाजार समिती बंद असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांना खासगी बाजारात शेतमाल विकावा लागनार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेत नेमकं गणित

SA vs IRE: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! तिसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेला आर्याला नो एन्ट्री? काय आहे कारण? वाचा...

Bigg Boss Marathi Grand Finale : ग्रँड फिनालेमध्ये सूरजची झापुक झुपुक स्टाईल, पाहा Photo

SCROLL FOR NEXT