Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim News : महावितरण विरोधात शेलुबाजार येथे छत्रपती संभाजीनगर-नागपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन

Washim News : शेलुबाजार परिसरात सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना विजेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे त्रस्त नागरिकांनी आज वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे छत्रपती संभाजीनगर- नागपूर महामार्गावर मुख्य चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीनगर- नागपूर मंगरुळपीर-अकोला महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

शेलुबाजार परिसरात सतत विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना विजेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत (Mahavitaran) महावितरण कंपनीला अनेक संघटना व नागरिकांनी निवेदन दिले होते. मात्र महावितरण कंपनी त्याची कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी संतप्त होत शेलुबाजार येथील मुख्य चौकात चक्काजाम आंदोलन केले. तसेच महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

महामार्गावर दोन्ही बाजूंनी लागल्या रांगा 

संभाजीनगर- नागपूर महामार्गावर सकाळी चक्काजाम आंदोलन केल्यामुळे मोठ्या प्रमाणात महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा (Rasta roko) लागल्या होत्या. काही वेळानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्यास लावले. यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT