BRS Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News: सोयाबीन पिवळे पडत असल्याने नुकसान; बीआरएसची तहसीलवर धडक, ५० हजार रुपये हेक्टरीची मागणी

Rajesh Sonwane

चेतन व्यास
वर्धा
: वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. परंतु सोयाबीन पीक पिवळे (Wardha) पडत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) मदत मिळावी यासाठी बीआरएसची तहसील कार्यालयावर धडक देत मदतीची मागणी केली आहे. (Tajya Batmya)

भारत राष्ट्र समितीचे उमेश वावरे यांच्या नेतृत्वात आज वर्धेच्या हिंगणघाट येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढत धडक देण्यात आली. वर्धा जिल्ह्यात सोयाबीनचे पीक (Soyabean Crop) मोठ्या प्रमाणात पिवळे पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे. शेतात केलेला खर्च निघणे देखील शक्य नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे..

दिला आंदोलनाचा इशारा 

सोयाबीन पिवळे पडत असल्याने तातडीने कृषी अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण करत शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात यावी. तसेच शेती पीकांवर आलेल्या संकटावर उपाययोजना करण्यात यावी. ही मागणी यावेळी करण्यात आलीय. मागणी मान्य न झाल्या मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT