Wainganga River Flood News
Wainganga River Flood News अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

Bhandara: वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलंडली; भंडारा-तुमसर राज्यमार्ग बंद तर १५० कुटुंबांचे स्थलांतर

अभिजीत घोरमारे

भंडारा: भंडारा (Bhandara) जिल्ह्याची जीवनदायिनी मानली जाणारी वैनगंगा नदीने (Wainganga River) धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीच्या पाण्याची पातळी ३ मीटरपेक्षा जास्त वाढली असल्याने भंडारा शहराला पुराचा (Flood) वेढा बसला आहे. याचा फटका भंडारा शहरालगत असलेल्या टाकली-खमाटा येथे बसला आहे. याठिकाणी पुराचे पाणी अडीच फुटावर आल्याने भंडारा-तुमसर राज्यमार्ग बंद झाला आहे. (Bhandara Latest News)

हे देखील पाहा -

भंडारा, तुमसर, मोहाडी या तालुक्यांना पुराचा फटका बसल्याने येथील तब्बल १५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवविण्यात आले आहे. भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनी, टप्पा मोहल्ला, खमाटा, कपिल नगर, गणेश नगरी आदि शहरालगतच्या भागात पुराचे पाणी येत असल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून येथील लोकांना विस्थापित केले आहे. तर जिल्ह्यात भंडारा, तुमसर, मोहाडी या तालुक्यात पुराचा फटका बसल्याने येथील तब्बल १५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवविण्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या पाण्याती पातळी सध्या स्थिर झाल्याने पुढील संभाव्य धोका सद्धा टळला असल्याचे सांगण्यात येत आहे.

वैनगंगा नदीचा पूर नियंत्रित करण्यासाठी गोसिखुर्द धरणाचे संपूर्ण 33 दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले असून १५ हजार १८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. विशेष म्हणजे २०२० नंतर पुन्हा २०२२ ला अशी पुरपरिस्थिती उद्भवली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil On Raj Thackeray | लाव रे तो व्हिडीओ दाखवणाऱ्या ठाकरेंची पाटलांनी थेट क्लिपच ऐकवली

Special Report : "त्यांना बघून घेईन.." उद्धव ठाकरेंनी पोलिसांना खुला इशारा का दिला?

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT