Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

कोरोना रुग्ण वाढल्यास निवडणुका पुढे ढकलाव्या लागतील; ठाकरे सरकारमधील मंत्र्याचे स्पष्ट संकेत

राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत

साम टिव्ही ब्युरो

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. कोरोनापासून (Corona) बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. दुसरीकडे राज्यात महापालिका निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू असून रुग्णसंख्या वाढत आहे. अशातच कोरोना रुग्ण वाढल्यास निवडणुका पुढे ढकल्याव्या लागतील. असे विधान राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केलं आहे.

राज्यासाठी पुढील 8 ते 10 दिवस महत्वाचे आहेत. निवडणुकीला अजून वेळ आहे. मात्र परिस्थिती उद्भवली तर निवडणूक आयोगाला विनंती करावी लागेल, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. नागपुरात माध्यमांसोबत बोलतांना त्यांनी हे विधान केलं आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसंदर्भात विजय वडेट्टीवार म्हणाले की, "राज्यसभा निवडणुकांवरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सामान्य जनतेला यांच्याशी काही देणे-घेणे नाही. भलत्याच गोष्टीकडे आम्ही चाललो. निवडणूक बिनविरोध व्हावी. लोकप्रतिनिधी या संदर्भात भावना बदलत असतात. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी असा आमचा प्रयत्न आहे".

केंद्राने काश्मीरबाबत कडक भूमिका घ्यावी.

काश्मीरमध्ये दररोज होणाऱ्या हिंदुंच्या हत्येसंदर्भात सुद्धा वडेट्टीवार यांनी विधान केलं आहे. काश्मिरी पंडितांचा मुद्दा आपण पाहिला आहेत. त्या काळातील परिस्थिती निवळले होती. पर्यटक जात होते. हे हल्ले केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. केंद्राने कडक भूमिका घ्यावी. उपयोजना करावी, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

निवडणुक बिनविरोध होणार?

महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज (शुक्रवारी) विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राज्यसभा निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी ही भेट घेणार आहे. यावेळी छगन भुजबळ, अनिल देसाई, सुनिल केदार, सतेज पाटील हे मविआ फडणवीसांची भेट घेणार आहेत. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हे नेते फडणवीसांशी चर्चा करणार आहेत. आज राज्यसभेच्या निवडणुकीच्या अर्जमाघारीचा शेवटचा दिवस आहे. भाजपने आपला अतिरिक्त उमेदवार धनंजय महाडिक यांचा अर्ज भरला असल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे. त्यामुळे फडणवीसांची मनधरणी करण्यासाठी मविआ नेते फडणवीसांशी चर्चा करणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT