Varandha Ghat Closed Saam Digital
महाराष्ट्र

Varandha Ghat Closed: वरंध घाट सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी 31 ऑगस्ट पर्यंत बंद; मोठं कारण आलं समोर

Sandeep Gawade

रायगड जिल्ह्यात गेले काही दिवस अतिमुसळधार पाऊस झाला होता. या पावसात पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या वरंध घाटात दरड कोसळून रस्ता खचला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. याची दखल घेत रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मार्ग बंद करण्याची अधिसूचना करण्यात आली आहे. 31 ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वहातुकीसाठी मार्ग बंद करण्यात आला आहे.

पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यास दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा प्रकारच्या घटना घडल्याने जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. सद्य:स्थितीत वरंध घाटातून प्रवास करणाऱ्या तसेच मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग 31ऑगस्ट 2024 पर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तशी अधिसूचना जारी केली आहे. प्रवासी आणि पर्यटकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT