Nitin Gadkari On Mumbai Road Saam Digital
महाराष्ट्र

Nitin Gadkari On Mumbai Road: मुंबईत खड्डे का पडतात? केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

Sandeep Gawade

Nitin Gadkari On Mumbai Road

मोटर व्हेईकल ऍक्टला राजकीय पक्षांनी विरोध केला. सव्वा वर्ष त्यांना समजण्यात गेला. संवेदनशील कायदाचा आदर आपल्या देशात नसल्याचं लक्षात आलं. त्यात जनजागृती करण्याचं काम केलं. जोपर्यंत लोकांच वागणं बदलत नाही तो पर्यंत हा प्रश्न सुटणार नाही, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाना पाटेकर यांनी वाहतूक नियमभंग केल्यानंतर इतका दंड का आकारला जातो यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत 2024 अंतर्गत नाना पाटेकर यांनी एका वृत्तवाहिनीवर मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी मत व्यक्त केलं आहे.

रिवार्ड सिस्टम सुरू झाल्याने खूप लोकांना वाहतूक नियम चालवनाऱ्याने रिवार्ड सुरू केल्याने फायदा झाला.. त्यामुळे नियम पळत असनाऱ्याना फायदा झाल्यानं फायदा झाला. मी बांधकाम मंत्री असतांना नियम बदलवत डोळे चेक करण्याची मोहीम सुरू केली. यात एका मुख्यमंत्र्यांचाच ड्रायव्हर आंधळा निघाला. केंद्रीय मंत्र्याचा चालक आंधळा निघाल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबईत रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडतात. तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत, नातू जिवंत असेपर्यंत खड्डे पडणार नाहीत. चांगले रस्ते बनले की नगरसेवक, अधिकारी नाराज होतात. सर्व सुरळीत चांगलं सुरू असतं. पण 40 वर्ष रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागरिकांनी स्वता मी वाहतूक नियम पाळेल असे कमिटमेंट केले पाहिजे. सिल्याबसमध्ये बदल व्हायला पाहिजे? आम्ही शिक्षण मंत्री यांना पत्र दिलं. आम्ही कार्टून फिल्म तयार करत रोड सेफ्टी सांगितली. मोठ्या लोकांना समजावू. लहान मुलं लवकर समजून घेतात. सर्वाना एकत्र करून नियम पाळण्याची प्रतिज्ञा घ्या. लायसन्स देतांना अनेक अटी आहेत मी महाराष्ट्र विधानसभेत 100 देऊन टप्पा मारायचे अशा अडचणी होतात. लायसन्स मिळवतात अभ्यास करावा लागणार आहे. यात ऑनलाइन परीक्षा असणारा आहे, ते दिल्यावर लायसन्स देणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कायद्याची भीती आणि जागरूकता असली पाहिजे.

दिल्लीत प्रदूषण खूप आहे. आम्ही नागपुरात कमी करण्यासाठी बायोगॅस, इलेक्ट्रिकवर वाहनं आणली. एअर पोलुशन कमी झाले पाहिजे. गाझिपूर, नागपुरात वेस्ट टू वेल्थ उपक्रम सुरू झाला. हॉर्न मध्ये कर्कश आवजा ऐवजी पक्ष्यांचे आवाज लावणार. प्रत्येकानं ठरवाव हॉर्न वाजवणार नाही. लग्नात जोर जोरात बँड वाजवतात. सुसंस्कृत बणून आपण वागायला सुरुवात केली की फायदा होईल, असं आवाहन नागरिकांना गडकरींनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT