आंबा घाटात खासगी बस दरीत कोसळली
सर्व ५० प्रवासी जखमी, जीवितहानी नाही
दुर्घटनेत बसचा चक्काचूर
साखरपा पोलीस पुढील तपास करत आहेत
रत्नागिरीतून मोठी बातमी समोर आली आहे. ५० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस आंबा घाटात ७० फूट खाली कोसळली असून ७ ते ८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला आहे. या घटनेचा सविस्तर तपास साखरपा पोलीस करत असून गाडीचा चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. आंबा घाट चक्री वळणावर ही घटना घडली असून बस ७० फुट खोल दरीत कोसळली आहे. या बसमध्ये ५० प्रवासी असल्याचं म्हटलं जात आहे. अपघात झालेल्या बसला दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न अद्याप सुरु आहेत.
सुदैवाने बस ७० फूट दरीत कोसळली असली तरी कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र बसमधील ७ ते ८ प्रवाशी किरकोळ जखमी असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच बस दरीत कोसळल्याने तिचा चक्काचूर झाला आहे. या घटनेची माहिती साखरपा पोलिसांना देण्यात आली. मिळालेल्या माहितीनंतर साखरपा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.