Weather Alert : राज्यातून पुन्हा थंडी गायब होणार? तापमानाचा पारा वाढला, कसे असेल आजचे हवामान?
Maharashtra Weather UpdateSaam tv

Weather Alert : राज्यातून पुन्हा थंडी गायब होणार? तापमानाचा पारा वाढला, कसे असेल आजचे हवामान?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडी कमी झाली असून दुपारी उन्हाचे तापमान वाढले आहे. पुढील ३-४ दिवस तापमान वाढीचे संकेत आहेत, त्यानंतर पुन्हा गारठा वाढण्याची शक्यता. बदलत्या हवामानाने नागरिक त्रस्त.
Published on
Summary
  • अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान १०°C च्या वर गेल्यामुळे गारठा कमी

  • पहाटे धुकं व थंडी, दुपारी उन्हाचा कडाका या बदलत्या हवामानामुळे नागरिक त्रस्त

  • पुढील ३–४ दिवस तापमान वाढणार

  • बदलत्या वातावरणाने आजारांना आमंत्रण

राज्यात थंडीची गुलाबी चादर पसरली असून काही ठिकाणी अंशतः तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी हुडहुडी आणि दुपारी उन्हाचा कडाका कायम आहे. आकाश निरभ्र होत असून तापमानात चढ-उतार होत आहेत. पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानातील वाढ कायम राहील. त्यानंतर पुन्हा गारठा वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमानाचा पारा वाढला असून गारवा कमी झाला आहे. तर काही ठिकाणी हुडहुडी कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात गारठा कायम असला, तरी किमान तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पारा १० अंशांच्या पुन्हा वर गेला आहे. पहाटे थंडी सोबतच धुकं दिसतं असून हवेत थंडी जाणवत आहे.

Weather Alert : राज्यातून पुन्हा थंडी गायब होणार? तापमानाचा पारा वाढला, कसे असेल आजचे हवामान?
Shocking : नगरमध्ये खळबळजनक घटना, ९ वीच्या मुलीला ‘तलब जिहाद’मध्ये अडकवण्याचा प्रयत्न, महिला शिक्षिकेचा प्रताप उघड

मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, निफाड, बीड, अहिल्यानगर, कोल्हापूर, माथेरान या ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ८.६ अंश तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात ८.७ अंश सेल्सिअस, तर भंडारा येथे पारा १० अंशांवर आल्याने गारठा कायम आहे.

Weather Alert : राज्यातून पुन्हा थंडी गायब होणार? तापमानाचा पारा वाढला, कसे असेल आजचे हवामान?
Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

काल म्हणजेच गुरुवारी कोकणातील रत्नागिरी येथे ३४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका जाणवत असून, उकाड्यात काहीशी वाढ होत आहे. आज राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असून थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सतत बदलत राहणाऱ्या हवामानाने नागरिकांना त्रस्त केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com