Vegetable Price Hike Saaam Tv
महाराष्ट्र

Vegetable Price Hike : मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचे दर कडाडले; टोमॅटोचा भाव १०० रुपये किलो, वांगीही महागली

Tomato Price Increases: सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बाजारात भाज्यांचे दर कडाडले आहे. टॉमेटो प्रति किलो १०० रुपये किलो विकले जात आहे. यामुळे सर्वसामन्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसली आहे.

राजेश काटकर

राज्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र आनंद झाला आहे. परभणी बाजारपेठेत टॉमेटोचे भाव प्रति किलो ८० ते १०० रुपयांना विकले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसला आहे.

टॉमेटोच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने टॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या घरात टॉमेटो हा वापरलाच जातो. टॉमेटोचे भाव वाढल्याने गोरगरीब ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री बसत आहे. त्यामुळे टॉमेटो खरेदी करावा की नाही असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे.

टॉमेटोसोबतच इतर अनेक पालेभाज्यांचे दर वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. भाजीपाल्यांचे दर वाढले असले तरीही त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होच नसल्याचे दिसत आहे. दलाल आणि विक्रेत्यांना या भाववाढीचा फायदा होत आहे.

भाजीपाल्यांचे दर

बाजारात मिरची ८० रुपये प्रति किलो विकली जात आहे. तर वांगी ७० आणि दोडके ५० रुपयांना विकले जात आहे. पालक-शेपू २५ रुपये प्रति जुडी विकली जात आहे. गवार ७० रुपये किलो तर भेंडी ६० रुपये प्रति किलो विकली जात आहे. बटाटा ७० रुपये किलो तर काकडी ६० रुपये प्रति किलो विकले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Schedule : आयपीएल वेळापत्रक जाहीर, या तारखेला पहिला सामना; कोणत्या तारखेला कोण भिडणार? वाचा

Maharashtra Live News Update: विजय सूर्यवंशी यांची पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त पदी नियुक्ती

LPG Cylinder: इराण-अमेरिकेच्या युद्धानं गॅसची टंचाई, उद्योग ठप्प, हॉटेल बंद...; राज्यभरातील परिस्थिती काय, जाणून घ्या?

Sulochana Chavan: सोळावं वरीस धोक्याचं....अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव रंगणार, कधी आणि कुठे?

प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नानंतर अवघ्या ४ वर्षांनी झाले वेगेळे

SCROLL FOR NEXT