संजय तुमराम, साम टीव्ही
चंद्रपूर जिल्हयातील सिदेंवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात भीषण आणि तितकीच मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या चार महिलांवर वाघाने अचानक हल्ला करून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिला सकाळच्या सुमारास लगतच्या जंगलात तेंदू पाने गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्या सर्व महिला एकाच ठिकाणी जवळपास काम करत असतानाच अचानक जंगलातून आलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली. या हल्ल्यात चारही महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
कवडूबाई दादाजी मोहुर्ले- वय 45
अनुबाई दादाजी मोहुर्ले- वय 46
संगीता संतोष चौधरी- वय 36
सुनीता कौशिक मोहुर्ले- वय33
सदर घटनेमुळे मोहुर्ले आणि चौधरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.