...तर कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे Saam TV
महाराष्ट्र

...तर कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

पोलीस विभागाचा अहवाल आल्यानंतरच आरोग्य विभागाच्या फेरपरीक्षेबाबत (Department of Health ReExam) निर्णय.

लक्ष्मण सोळुंके

जालना : राज्यातील लसीकरण (Vaccination) राहिलेल्या नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावं. समाजाला सुरक्षित ठेवायचं असेल तर लसीकरण करून घेणं गरजेचं असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. लसीकरण केल्यास चौथ्या लाटेचा धोका नसल्याचं राजेश टोपे म्हणाले.

दरम्यान, पोलीस विभागाचा अहवाल आल्यानंतरच आरोग्य विभागाच्या फेरपरीक्षेबाबत (Department of Health ReExam) निर्णय घेतला जाणार असून गृहमंत्र्यांशी याबाबत माझी चर्चा झाली असून लवकर पोलिसांचा अहवाल आल्यास लवकर निर्णय घेण्याची राज्य सरकारची ईच्छा असल्याचही टोपे म्हणाले.

निर्बंध कमी करण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून निर्बंध कमी केले जातील मात्र मास्क मुक्ती सध्या नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत बैठक झाली असून साखर आयुक्तालय याबाबत योग्य निर्णय घेईल. पण शेतकऱ्यांनी धीर धरुन सहकार्य करावे. सर्व शेतकऱ्यांची ऊस तोडणी होईल असंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: शनिदेव या ४ राशींवर कोपणार, काहींची होणार भरभराट; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

IPL 2026: 'चेस मास्टर' कोहलीचा धमाका; साईच्या शतकानंतरही गुजरातचा पराभव, आरसीबीचा दिमाखदार विजय

Petrol Price Hike: २९ एप्रिलनंतर पेट्रोल 28 रुपयांनी महागणार? मुंबई-पुण्यात किती होणार दर?

RCB vs GT : आरसीबीच्या नावावर नकोसा विक्रम; 'त्या' यादीत पहिल्या क्रमांकावर, मुंबई-चेन्नई कुठे?

भारतासाठी इराणचा ट्रम्पसोबत पंगा, भारताला नरक म्हटल्यानं इराणचा संताप

SCROLL FOR NEXT