कालवा 
महाराष्ट्र

घोडचे पाणी अडचणीतून काढणार मार्ग

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर : घोडच्या लाभक्षेत्रात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कुकडीचे येडगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने कुकडीचे आवर्तन सुरु आहे. आता घोड धरण ३३ टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने व पाण्याची गरज असल्याने आवर्तनाची मागणी होत आहे.

दरम्यान काष्टी ते श्रीगोंदे दरम्यान सुरु असणाऱ्या रस्त्याच्या कामातील पुलामुळे घोडचा कालवा बुजविल्याने अडचणीत भर आहे. तथापि यात मार्ग काढून जलसंपदा विभाग घोडचे पाणी सोडण्यासाठी प्रयत्नशिल असल्याने दिलासा मिळाला आहे.The cycle of the Ghod canal will begin

घोड धरणात नियमानूसार ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा हवा आहे. सध्या ३२ टक्के साठा असून त्यात वाढ होत आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पाऊस नसल्याने पाण्याची मागणी होत आहे. पावसाने दडी मारली असतानाच जोराचा वारा आणि ढगाळ वातावरणामुळे जमिनीतील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय. त्यामुळे पिकांना पाण्याची गरज वाढली आहे. या सगळ्या चिंतेत न्हावरा ते बीड या रस्त्याचे काम सुरु असून काष्टी ते श्रीगोंदे दरम्यान काम सुरु आहे.

घोडचा कालवा हा रस्ता ओलांडून पुढे जातो. तेथे नवीन पुलाचे काम सुरु असल्याने कालवा बुडविण्यात आला आहे. शिवाय काही महिने ते काम चालणार असल्याचे सांगण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांच्या संकटात भरच पडली आहे.

याबाबत कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांना विचारले असला, घोडमध्ये उपलब्ध पाण्यानुसार वरिष्ठ कार्यालयात आवर्तन सोडण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्याची लवकरच मंजूरी मिळेल. त्यामुळे येत्या सहा ते सात दिवसात आवर्तन सोडले जाईल. The cycle of the Ghod canal will begin

पुलाचे काम सुरू असल्याने कालवा बुजला असला तरी त्यात मार्ग काढला जाईल. गरज पडल्यास वरच्या भागातून आवर्तन सुरू अन्यथा ठेकेदाराकडून तात्पुरती दुरुस्ती करुन आवर्तन सुरळीत करू मात्र त्यामुळे आवर्तन रखडणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Railways: TTE आणि TC यांच्यातील फरक तुम्हाला माहितीये का?

Maharashtra News Live Update: सलग पाच दिवसांच्या अतिवृष्टीचा नालासोपाऱ्यात तिसरा बळी; पाण्यात पोहताना १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमधील शिवसेनेच्या बड्या नेत्यावर गुन्हा, नेमकं प्रकरण काय?

पावसात भिजल्यानंतर प्या गरमा गरम ब्रोकोली सूप, हुडहुडी होईल दूर

ITR Filing 2026-27: ITR भरताना कर्ज, वारसा हक्कातून मिळालेले पैसे दाखवावे लागतील का? नवीन नियम सोप्या भाषेत समजून घ्या

SCROLL FOR NEXT