तळीयेतील जलनीमाता डोंगराला भेग ! राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

तळीयेतील जलनीमाता डोंगराला भेग !

प्रशासनाकडून डोंगराचे सर्वेक्षण सुरू. तळीयेमध्ये10 हेक्टरमध्ये वसणार नवे गाव...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावातील जलनी माता डोंगर कोसळून कोंडाळकर वाडीतील 32 कुटुंबावर काळाने घाला घातला. या दुर्घटनेत 84 ग्रामस्थांचा दरडीखाली दडपून मृत्यू झाला आहे.

हे देखील पहा -

तळीयेमध्ये कोसळलेल्या जलनी माता डोंगराला दोन फुटाची भेग पडली असल्याने त्यातून पाण्याचा लोट वाढून ही दुर्घटना झाली आहे. याबाबत भुवैज्ञानिक हे स्थानिकांच्या मदतीने सर्वेक्षण करत आहेत. त्याचबरोबर तळीये ग्रामपंचायत हद्दीतील कोंडळाकर वाडी, म्हस्के वाडी, यादव वाडी, सुतारकोंड अशा सात वाड्यांचे पुनर्वसन हे 10 हेक्टर जागेत तळीये मध्येच केले जाणार आहे.

यासंदर्भात तळीये गावचे उपसरपंच महेश म्हस्के यांनी माहिती दिली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही पावले उचलली जात आहेत. त्यामुळे तळीये गावातच संपूर्ण गाव पुन्हा एकदा उभारले जाणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! संभाजीनगरमध्ये २३ नगरसेवक अपात्र ठरणार? प्रशासनाकडून नोटीस जारी; कारण काय?

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

SCROLL FOR NEXT