grampanchayat, mobile, tv saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : पंढरपुरात संध्याकाळी ६ ते ८ मोबाइल-टीव्ही बंद; हा निर्णय घेण्यामागचं कारण काय? (व्हिडिओ पाहा)

या निर्णयाचा ग्रामस्थांनी स्वागत केले.

भारत नागणे

Pandharpur News : टीव्ही आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यावर व शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ लागला आहे. यावर उपाय म्हणून सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत गावातील सर्व टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय पंढरपूर तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.

या निर्णयाची माहिती ग्रामपंचायतीच्या शिपायाने गावातून दवंडी पेटवून दिली आहे. या दवंडीचा व्हीडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा आगदी तोंडावर आल्या आहेत. मुलांचे लक्ष अभ्यासात लागावे यासाठी गावातील प्रत्येक घरातील टीव्ही,मोबाईल दररोज दोन तास बंद ठेवण्याचा निर्णय़ येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

या निर्णयाची माहिती ग्रामपंचायतीच्या (grampanchayat) शिपाया मार्फत गावातून दररोज दवंडी देवून केली जात आहे. या उपर गावातील कोणी दिलेल्या वेळेत टीव्ही अथवा मोबाईलचा वापर करताना आढळून आल्यास त्या कुटुंबाला एक हजार रुपये दंड करण्याचाही निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. शाळेतील मुलांच्या अभ्यासासाठी असा निर्णय घेणारी देगाव ग्रामपंचायत सोलापूर (solapur) जिल्ह्यात एकमेव ठरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT