Raju Shetty Aakrosh Padyatra Saam Digital
महाराष्ट्र

Raju Shetty Aakrosh Padyatra: राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला पुन्हा सुरुवात

Raju Shetti Aakrosh Padyatra: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राजू शेट्टी यांनी सुरू केलेली आक्रोश यात्रा 30 ऑक्टोंबर रोजी स्थगिती केली होती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raju Shetty Aakrosh Padyatra

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राजू शेट्टी यांनी सुरू केलेली आक्रोश यात्रा 30 ऑक्टोंबर रोजी स्थगिती केली होती. मात्र सांगलीच्या जयंत पाटील यांच्या राजाराम बापू कारखान्यापासून राजू शेट्टींनी पुन्हा आक्रोश यात्रेस सुरुवात केली आहे. दुसरा हप्ता ४०० रुपये द्या या मागणीचे निवेदन कारखाना प्रशासनाला देत यात्रेला सुरवात करण्यात आली.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ कारखाने आहेत. या कारखान्यांनी ३ कोटी टन उसाचे प्रती टन ४०० रुपये प्रमाणे बाराशे कोटी देणे बाकी आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रोश पद यात्रेचे आयोजन केले आहे. शिरोळमधून १७ ऑक्टोबर रोजी पदयात्रेला सुरुवात झाली होती. १४ दिवसांमध्ये शिरोळ ते शाहूवाडी पर्यंत ३०० किमीपेक्षा अधिक पदयात्रा पूर्ण झाली. या यात्रेला शेतकऱ्यांमधूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात आली होती. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या आंदोलनालाही फटका बसला होता. त्यामुळे राजू शेट्टी यांनी आंदोलन स्थगित करत मराठा आंदोलनाला पाठिंबा दिली होता. आता मराठा आंदोलन स्थगित झाल्यामुळे पुन्हा आक्रोश यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT