Raju Shetty Aakrosh Padyatra Saam Digital
महाराष्ट्र

Raju Shetty Aakrosh Padyatra: राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला पुन्हा सुरुवात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raju Shetty Aakrosh Padyatra

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राजू शेट्टी यांनी सुरू केलेली आक्रोश यात्रा 30 ऑक्टोंबर रोजी स्थगिती केली होती. मात्र सांगलीच्या जयंत पाटील यांच्या राजाराम बापू कारखान्यापासून राजू शेट्टींनी पुन्हा आक्रोश यात्रेस सुरुवात केली आहे. दुसरा हप्ता ४०० रुपये द्या या मागणीचे निवेदन कारखाना प्रशासनाला देत यात्रेला सुरवात करण्यात आली.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ कारखाने आहेत. या कारखान्यांनी ३ कोटी टन उसाचे प्रती टन ४०० रुपये प्रमाणे बाराशे कोटी देणे बाकी आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रोश पद यात्रेचे आयोजन केले आहे. शिरोळमधून १७ ऑक्टोबर रोजी पदयात्रेला सुरुवात झाली होती. १४ दिवसांमध्ये शिरोळ ते शाहूवाडी पर्यंत ३०० किमीपेक्षा अधिक पदयात्रा पूर्ण झाली. या यात्रेला शेतकऱ्यांमधूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात आली होती. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या आंदोलनालाही फटका बसला होता. त्यामुळे राजू शेट्टी यांनी आंदोलन स्थगित करत मराठा आंदोलनाला पाठिंबा दिली होता. आता मराठा आंदोलन स्थगित झाल्यामुळे पुन्हा आक्रोश यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT