file photo shirol 
महाराष्ट्र

सरकार विराेधात ४९ गावांतील ग्रामस्थ एकटवले; माेर्चाचा निर्धार

संभाजी थोरात

काेल्हापूर : जिल्ह्यातील महापुराचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यातील ४९ गावांतील ग्रामस्थ विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुक्यात मोर्चा काढणार आहेत. पुररेषेच्या आत येणाऱ्या शेतीला १०० टक्के भरपाई मिळावी, उसाची भरपाई सरसकट दाेन हजार रुपये प्रति गुंठा मिळावी, जनावरांना चारा मिळावा. भूमीहिन शेतकऱ्यांना पाच लाख रुपये विना व्याज कर्ज मिळावे आदी मागण्यांसाठी हा माेर्चा असणार आहे.

अतिवृष्टी आणि महापुराने काेल्हापूर जिल्ह्यात हजाराे हेक्टर शेतीचे नुकसान झालेले आहे. या भागात काेट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या डाेळ्यासमाेर शेती उद्धवस्त झाली आहे. शिराेळ तालुक्यात अंदाजे २० हजार २६० हेक्टरवरील विविध पिके पुराच्या पाण्यात खराब झालेली आहेत. यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे.

राज्य शासनाने आमचा तालुका शंभर टक्के पूरग्रस्त जाहीर करावा अशी मागणी ग्रामस्थांची आहे. याबराेबरच शिराेळ तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी देखील मागणी असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. दरम्यान तालुक्यात शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समिती स्थापित करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावा गावात पाहणी करुन शेतक-यांच्या व्यथा समजून घेतल्या जात आहे. याबराेबरच एक माेठा मोर्चा काढण्याचे नियाेजन केले जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

SCROLL FOR NEXT