शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज
विशेष फेरी सेवा सुरू करण्यात आली
मुंबईतील भाऊचा धक्का येथून विजयदुर्गपर्यंत फेरीने प्रवास करता येणआर
ही सेवा 1 मार्चपासून सुरू होणार असून एकूण 6 दिवस फेरी धावणार आहे
शिमग्यासाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शिमग्याआधी कोकणी माणसासाठी फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली. शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गर्दी लक्षात घेता फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला. कोकणामध्ये शिमग्यासाठी आता बोटीने जाता येणार आहे. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोकणामध्ये शिमग्यासाठी आता बोटीने जाता येणार आहे. मुंबईवरून अवघ्या ७ तासांमध्ये तुम्हाला विजयदुर्गला पोहचता येणार आहे. १ मार्चपासून समुद्री मार्गे तळकोकणात जाता येणार आहे. एम टू एम फेरीचे वेळापत्रक मंत्री नितेश राणे यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईतल्या भाऊचा धक्क्यावरून विजयदुर्गपर्यंत फेरीने प्रवास करता येणार आहे. नितेश राणेही पहिल्या दिवशी बोटीने प्रवास करणार आहेत.
- १ मार्च -
भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.
- २ मार्च -
विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.
- ४ मार्च -
भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.
- ५ मार्च -
विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.
- ७ मार्च -
भाऊचा धक्का येथून सकाळी ८ वाजता फेरी सुटेल, ती विजयदुर्ग येथे दुपारी ३ वाजता पोहोचेल.
- ८ मार्च -
विजयदुर्ग येथून दुपारी १२ वाजता फेरी सुटेल, ती सायंकाळी ७ वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचेल.