छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेल्या कोल्हापूर नगरीतला हा किळसवाणा प्रकार...तेही घडलाय शिवजयंतीच्याच दिवशी...गुरूवारी संपूर्ण राज्यात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत होता. मात्र पन्हाळगडावरून ज्योत घेऊन येत असताना अतिउत्साही तरूणांची अशी हुल्लडबाजी सुरू होती. त्यांनी 60 ते 70 दुचाकींचे सायलेन्सर काढले आणि कर्णकर्कश आवाज काढत अक्षरश: धिंगाणा घातला.
एव्हढ्यावरच त्यांचं समाधान झालं नाही तर त्यांनी एक बाईक पंचगंगा नदीत फेकून दिली, काहींनी एक बाईक जाळून टाकली. खानाच्या फौजासारखा धुमाकूळ घालणाऱ्या या टोळक्यानं भुदरगड, कसबा सांगावं इथं तर कहरच केला. त्यांनी एका तरूणावर हल्लाही केला. आता तरूणांच्या या सैतानी कृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतायेत.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिस्त आणि संयमांचं प्रतिक...मात्र महाराजांच्या पराक्रमाची पताका जिथं डौलानं फडकते त्याच कोल्हापुरात तरूणाईनं घातलेला धिंगाणा साऱ्या महाराष्ट्राला लाज आणणारा आहे. पोलिसांनी अशा टवाळखोरांचा माज उतरवण्याची गरज आहे, तीच खऱ्या अर्थानं शिवजयंती असेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.