Shahajibapu Patil Saam Tv
महाराष्ट्र

Shahajibapu Patil: शहाजीबापू पाटील राजकारण सोडण्याच्या तयारीत, म्हणाले वरिष्ठ नेत्यांशी बोलून....

Maharashtra Politics: सोलापूरचे शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना शहाजीबापू यांनी थेट भाजप नेत्यावर गंभीर आरोप केले.

Priya More

Summary -

  • शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाची छापेमारी

  • या कारवाईनंतर त्यांनी राजकारण सोडण्याचा विचार मनात आल्याचे सांगितले

  • दीपक साळुंखे आणि जयकुमार गोरे यांच्यावर केले गंभीर आरोप

  • या घटनेमुळे सोलापुरमधील भाजप- शिवसेनेतील वाद समोर आला आहे

सोलापुरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. याठिकाणी शिवसेना-भाजपमधील वाद शिगेला पोहचताना दिसत आहे. शिवसेना शिंदेगटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. फक्त शहाजीबापूच नाही तर त्यांच्या निकटवर्तीयांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. या धाडसत्रावर आता शहाजीबापू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपच्या बड्या नेत्यावर गंभीर आरोप केला. तसंच राजकारण सोडून देण्याचा विचार मनात येत असल्याचे सांगितले.

धाड पडल्यानंतर शहाजीबापू पाटील यांनी सांगितले की, 'हे सगळं चुकीच्या दिशेने राजकारण सुरू आहे. राजकारण सोडून देण्याचा विचार आज मनात येत आहे. वरिष्ठ नेत्यांशी बोलून मी आता थांबण्याचा विचार करत आहे. अशा राजकारणाची पद्धत कधी सांगोल्यात झाली नाही. मी अनेक निवडणुका लढवल्या पण अशी कारवाई कधी झाली नाही. सांगोल्याच्या स्वाभिमानी जनतेने हे सगळं पहावं. या धाडीमागे सांगोल्यामधील माजी आमदार दीपक साळुंखे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत हे काम केले आहे.'

सांगोलामधील कार्यालयात पडलेल्या धाडीनंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मनात राजकारणातून बाजूला होण्याचा विचार आला आहे. त्यांनी ही बाब पत्रकार परिषदेत बोलून देखील दाखवली. त्यांनी भाजप नेत्यासह माजी आमदारावर केलेल्या गंभीर आरोपामुळे आता सोलापुरात भाजप-शिवसेनेतील वाद वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

तर, पराभवाच्या भीतीमुळेच शहाजीबापू पाटील यांची स्टंटबाजी सुरू असल्याची प्रतिक्रिया आमदार बाळासाहेब देशमुख यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यानंतर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना पराभव समोर दिसू लागल्याने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ते आरोप करत आहेत. केवळ मत मिळवण्यासाठी त्यांची ही स्टंटबाजी सुरू असल्याचा आरोप बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT