Maharashtra School update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra School : महाराष्ट्रात शाळा कधीपासून सुरू होणार? शालेय शिक्षण विभागाने सांगितली अधिकृत तारीख

Maharashtra School update : महाराष्ट्रात शाळा कधी सुरु होणार, याविषयी महत्वाची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली. शालेय शिक्षण विभागाने थेट अधिकृत तारीख सांगितली.

Saam Tv

मुंबई : राज्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार 16 जून रोजीपासून सुरु आहे. तर विदर्भात सोमवार दिनांक 23 जून 2025 पासून होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी 'शाळा प्रवेशोत्सवा'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.

शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी आणि मुलांची उपस्थिती वाढवण्याकरीता शालेय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण राज्यात 'शाळा प्रवेशोत्सव' उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. 'शाळा प्रवेशोत्सव' उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्र्यांना नजिकच्या शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमध्ये भेट देण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलंय.

या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत शालेय गणवेश आणि इतर सोयी सुविधांचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक यांच्याशी चर्चा करुन विद्यार्थ्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत प्रवेश घेण्याकडे कल कसा वाढेल, यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.

मुख्य सचिवांकडून आढावा

राज्यातील लोकप्रतिनिधींबरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळांना भेट द्यावी. याबाबत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नुकताच आढावा घेतलाय. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हा स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी यांनी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करावे. तसेच शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी उपाययोजना सूचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांमध्ये संख्याज्ञान व कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपूण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत दुसरी ते पाचवीच्या वर्गातील किमान 75 टक्के विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार अध्ययन क्षमता प्राप्त करणे हे ध्येय आहे. या कार्यक्रमांतर्गत पालकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळण्याकरिता शासनाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांनी ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमामध्ये पालकांशी हितगुज साधावे. तसेच सर्व अधिकाऱ्यांना दत्तक शाळा घेण्याबाबत जबाबदारी देण्यात आली आहे, त्यानुसार सचिवांनी देखील पुढाकार घेऊन राज्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सहकार्य करावे, अशी विनंती शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन यांनी केली आहे.

शाळेस भेट देत असताना शाळेतील भौतिक सुविधांचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या खेळांच्या सुविधांचा दर्जा, शाळेतील पूरक व्यवस्था, शालेय व्यवस्थेचा दर्जा, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेच्या सवयी, प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेंतर्गत देण्यात येणारा पोषण आहार आदी विविध विषयांबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. या भेटीमुळे समाज, पालक, विद्यार्थी, शिक्षक यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होण्याबरोबरच बालकांना आत्मविश्वासपूर्वक व्यक्त होण्याची संधी दिली जाईल. त्याचबरोबर दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास श्रीमती कुंदन यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grow coriander at home: घरच्या कुंडीत नीट कोथिंबर उगवत नाहीये? या सोप्या टीप्सचा करा वापर

Lpg Gas cylinder Colour: सर्व गॅस सिलेंडर हे लाल रंगाचेच का असतात?

मोठी बातमी! निधी वाटपात मुंबई महापालिका अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार?

Suryakumar-Devisha Love story : देविशाला डान्स करताना पाहिलं अन् सूर्याची विकेट पडली; विश्वविजेत्या कर्णधाराची हटके लव्हस्टोरी

Beetroot Juice : ७ दिवस दररोज बीटरूटचा ज्यूस प्यायलात तर शरीराला मिळतील हे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT