सातारा : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सध्या एका महिलेकडून गंभीर आरोप होत आहेत. या आरोपांचे पडसाद सध्या अधिवेशनात उमटत आहेत. या महिलेनं जयकुमार गोरे यांनी त्यांना वारंवार त्रास दिल्याचा आरोप केला आहे. जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार माझी बदनामी केली जात आहे. त्यामुळे या सर्व त्रासाला कंटाळून १७ मार्च २०२५ला मी मुंबई येथे राजभवनला आमरण उपोषणाला बसणार आहे, असा इशारा या पीडित महिलेनं दिला आहे. या महिलेनं जयकुमार गोरे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत.
यावेळी संबंधित महिलेनं आणखी एक खळबळजनक दावा केला. गेल्या दोन दिवसांपासून आणखी एक महिला माझ्या संपर्कात आहे. मी तिचं नाव सांगून तिची ओळख उघड करणार नाही. मात्र, माझं जयकुमार गोरे यांच्याबाबत जे मत आहे, तेच तिचंही मत आहे. ती येत्या दोन दिवसांत मीडियासमोर येऊन जयकुमार गोरे यांच्याबाबत बोलेल, असा दावा संबंधित महिलेनं केला आहे.
दरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. हे आपल्या विरोधात राजकीय कटकारस्थान होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. २०१९ मध्ये जयकुमार गोरेंना शपथविधीसाठी केस आडवी येत होती, तेव्हा त्यांनी मला प्रेशर आणलं. आम्ही तुम्हाला जीवे मारू, कुटुंबाला त्रास देऊ, अशी मला धमकी देण्यात आली. त्यामुळे ऑक्टोबर २०१९ मध्ये मी ती केस मागे घेतली. मी केस करताना डगमगले नाही, मी तेव्हाही डगमगले नाही. मी म्हणाली की, मला लेखी लिहून हवं की, मी पुन्हा असं करणार नाही. कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही. मग जयकुमार गोरे यांनी मला माफीनामा लिहून दिला. त्यावेळी कोर्टाच्या चेंबरमध्ये जिथे मी भावासोबत बोलत होते, तेव्हा गोरे यांनी मला दंडवत घातला होता. मला वाटलं एवढी शिक्षा झाल्यावर हे पुन्हा असं करणार नाही. त्यामुळे चांगुलपणाच्या भावनेतून मी केस मागे घेतली. अन्यथा जयकुमार गोरे या केसमधून निर्दोष सुटले नसते. ही केस निर्दोष सुटण्यासाठी नव्हती, असंही त्यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.