Sangli News Today: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील वारणा नदीत बुडून दोन सख्या मावस भावांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारस घडली.
या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अमोल प्रकाश सुतार (वय १६ वर्ष) आणि रविराज उत्तम सुतार (वय १२ वर्ष) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, मुळ कराड (Satara) तालुक्यातील राजमाची गावातील रहिवाशी असलेला रविराज सुतार हा सुट्टीनिमित्त आपल्या मावशीकडे तांदुळवाडी (Sangali) गावात आला होता. आपला मावसभाऊ गावी आल्याने अमोलला खूप आनंद झाला. आता मौजमस्ती करून उन्हाळ्यातील सुट्ट्यांचा आनंद साजरा करायचा असं दोघांनी ठरवलं.
शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अमोल आणि रविराज हे दोघेही वारणा नदीकाठी फिरायला गेले. यावेळी आपण नदीतून वैरण काढूयात म्हणून ते पाण्यात उतरले. दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुरळप पोलीस (Police) ठाण्यात कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी लाईफ फाऊंडेशन रेस्क्यू फोर्स यांच्या टीमला पाचारण करून अमोल आणि रविराज दोघांचेही मृतदेह नदीपात्राच्या बाहेर काढले. रविराज सुतार हा सुट्टीनिमित्त आपल्या मावशीकडे आला होता. तो सातवीत शिक्षण घेत होता. त्याचे आई वडील हे मोलमजुरी करून रविराजचं शिक्षण करत होते. मात्र, रविराजच्या अशा अचानक निघून जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. (Breaking Marathi News)
दुसरीकडे अमोल प्रकाश सुतार हा आई-वडिलांना एकूलता एक मुलगा होता. त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. प्रकाश सुतार यांचीही परिस्थिती बेताचीच असून त्याच्या निधनाने सुतार कुटुंबीयांवर डोंगर कोसळला आहे. दोन सख्ख्या मावस भावाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.