NCP saam tv
महाराष्ट्र

NCP News : 'राज्य सरकारने गुजरातची चाकरी करणे बंद करावे'; राष्ट्रवादीच्या आंदाेलनास प्रारंभ

सांगली जिल्ह्यात एनसीपीने छेडले आंदाेलन.

विजय पाटील

NCP News : कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प गुजरातला जात असल्याच्या निषेधार्थ सांगलीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करत राज्य सरकारच्या या कृतीचा निषेध करण्यात आला. राज्य सरकार गुजरात मध्ये जाणारे प्रकल्प रोखण्यास अपयशी ठरल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी केला. (Sangli Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या म्हणाल्या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्प हे महाराष्ट्रासाठी आवश्यक होते. राज्य सरकारने ते का थांबवले नाहीत ? असा सवाल ही उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत असताना गुजरातमध्ये जाणारे प्रकल्प हे महाराष्ट्रात राहिले असते तर बेरोजगारी कमी करण्यास मदत झाली असती. मात्र राज्य सरकार हे गुजरातची चाकरी करत असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी केला आहे. (Maharashtra News)

दरम्यान राज्य सरकारच्या कृतीचा निषेध करत आज सांगलीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन करत मोठे प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याच्या या संपूर्ण प्रकाराचा निषेध केला. महाराष्ट्र सरकारने (maharashtra government) महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि असे प्रकल्प हे महाराष्ट्रातच राहावे अशी मागणी यावेळी अनिता पाटील यांच्यासह राष्ट्रवादी (ncp) महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghee Use For Hair: केसांना तूप लावण्याचे अद्भुत फायदे जाणून घ्या

Eggs Vs Paneer : प्रोटीनसाठी उत्तम काय?उकडलेले अंडे की पनीर? जाणून घ्या योग्य डाएटचा पर्याय

Mumbai Eastern Expressway: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी; आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Maharashtra Live News Update: मराठा नेते मनोज जरांगे आज पुण्यातल्या भोर तालुक्याच्या दौऱ्यावर

ICICI Rules : आता बँक अकाउंटमध्ये ₹ ५०००० किमान बॅलेन्स ठेवावा लागणार, ICICI चा नवा नियम कुणाला होणार लागू?

SCROLL FOR NEXT