समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण समृद्धी महामार्गावर टोलवाढ होणार आहे. टोलसाठी १९ टक्क्यांहून अधिक पैसे भरावे लागणार आहेत. १ एप्रिलपासून ही टोलवाढ होणार आहे.
नागपूर ते मुंबई या ७०१ किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. येत्या महिनाभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित ७६ किलोमीटरचा मार्ग सेवेत दाखल होणार आहे. मात्र हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच एमएसआरडीसीने त्याच्या टोलमध्ये मोठी वाढ केली आहे.
१ एप्रिलपासून समृद्धी महामार्गावर नवे टोलदर लागू होणार आहेत. पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२८ पर्यंत ते लागू राहतील असे एमएसआरडीसीने सांगितले आहे. नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार हलकी वाहने यांना सध्या १०८० रुपयांचा टोल भरावा लागायचा. मात्र नव्या दरानुसार १,२९० रुपये टोल द्यावा लागेल.
- हलकी, व्यावसायिक, मिनीबससाठी सध्या १७४५ रुपये टोल द्यावा लागतो. नवीन टोलदर २०७५ झाला आहे.
- बस किंवा दोन आसाचा ट्रकसाठी सध्या ३६५५ रूपये टोल दिला जातो. नवीन दरवाढीनुसार ३६५५ रुपये टोल भरावा लागेल.
- अति अवजड वाहनांना सध्या ६९८० रुपये टोल भरावा लागतो. नव्या दरवाढीनुसार ६९८० रुपये टोल भरावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.