Marathwada Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Marathwada Water Scarcity : पावसाळ्यातही नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरूच; अजूनही १६२८ गावांत टँकरद्वारे पाणी पुरवठा

Sambhajinagar News : मे महिन्याच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १८ मेपर्यंत १८३७ पर्यंत टँकरचा आकडा होता.

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला. धरणातील पाणीसाठा आटल्याने पाणी टंचाई अधिक तीव्र स्वरूपात जाणवत होती. यामुळे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. मात्र पावसाळा सुरु झाल्यानंतर देखील पाणी टंचाईच्या झळा कमी झालेल्या नसून आजही मराठवाड्यातील १ हजार ६२८ गावांमध्ये पाण्याचे टँकर सुरु आहेत. 

मराठवाड्यात पावसाने जून महिन्यातील सरासरी (Sambhajinagar) गाठल्याचे आकडे सांगत असताना एकूण लोकसंख्येच्या १० टक्के नागरिक अजूनही टँकरच्या पाण्यावर तहान भागवत आहेत. पावसाळा सुरू झाला तरीही मराठवाड्यात पावसाळ्यात १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी पुरवठा (Water Scarcity) सध्या सुरू असून नागरिकांची तहान भागविण्यात येत आहे. विभागात पाणी टंचाईचे संकट कमी होत लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांत सुमारे १५ टक्के जलसाठा आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला विभागात ९६१ गावे आणि ३४५ वाड्यांना सुमारे १४२४ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. १८ मेपर्यंत १८३७ पर्यंत टँकरचा आकडा होता. आता १९ जूनपर्यंत १९३८ टँकरचा आकडा आहे. २४ जून पर्यंत १६९६ टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. 

मराठवाड्यात पाऊस (Rain) बरसत असला तरी मोठ्या, लघू आणि मध्यम प्रकल्पांत साठा नसल्यामुळे पाणी टंचाईचे सावट कायम आहे. विभागाच्या वार्षिक ६७८ मि.मी. सरासरीच्या तुलनेत १६९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान सद्यस्थितीला ११६५ गावे आणि ४९३ वाड्यात टंचाई असून टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शिवाय ३ हजार ९४२ विहिरीचे अधिग्रहण कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

Monsoon Sweating : पावसाळ्यात जास्त घाम का येतो? यावर उपाय काय?

SCROLL FOR NEXT